मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान केंद्रावर मत दिल्यानंतर मतदाराच्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते, हे सर्वांनाच परिचित आहे. मात्र ही शाई नेमकी कोणत्या बोटावर, कोणत्या कारणासाठी आणि अपंग मतदारांच्या बाबतीत कुठे लावली जाते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मत दिलेल्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटावर अमिट शाई लावली जाते. ही शाई नखापासून पहिल्या सांध्यापर्यंत ब्रशच्या साहाय्याने लावण्यात येते. यामागील उद्देश एकच कोणत्याही व्यक्तीने पुन्हा मतदान करू नये आणि प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहावी.


ही शाई सहज न निघणारी असून ती काही दिवस बोटावर स्पष्टपणे दिसत राहते. त्यामुळे मतदान झाल्याची ओळख कायम राहते.



डाव्याच हातावर शाई का?


दैनंदिन कामांमध्ये बहुतेक लोक उजव्या हाताचा वापर करतात. शाईतील रसायनांचा अन्नाशी किंवा तोंडाशी थेट संपर्क येऊ नये, यासाठी डाव्या हाताच्या बोटावरच शाई लावण्याची पद्धत अवलंबली जाते.



बोट नसल्यास काय नियम?


जर एखाद्या मतदाराचा डाव्या हातावरील पाहिलं बोटं नसेल, तर डाव्या हातावरील दुसऱ्या बोटावर शाई लावली जाते. डाव्या हातावर एकही बोट नसेल, तर उजव्या हाताच्या बोटावर शाई लावण्याची तरतूद आहे.



दोन्ही हात नसतील तर?


अशा विशेष परिस्थितीत संबंधित मतदाराच्या पायाच्या अंगठ्यावर शाई लावली जाते. त्यामुळे शारीरिक अडचणी असलेल्या नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावता येतो आणि त्याची नोंद ठेवली जाते. मतदान प्रक्रिया सर्वसमावेशक राहावी आणि प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने हे नियम निश्चित केले आहेत.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व