मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान केंद्रावर मत दिल्यानंतर मतदाराच्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते, हे सर्वांनाच परिचित आहे. मात्र ही शाई नेमकी कोणत्या बोटावर, कोणत्या कारणासाठी आणि अपंग मतदारांच्या बाबतीत कुठे लावली जाते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मत दिलेल्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटावर अमिट शाई लावली जाते. ही शाई नखापासून पहिल्या सांध्यापर्यंत ब्रशच्या साहाय्याने लावण्यात येते. यामागील उद्देश एकच कोणत्याही व्यक्तीने पुन्हा मतदान करू नये आणि प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहावी.


ही शाई सहज न निघणारी असून ती काही दिवस बोटावर स्पष्टपणे दिसत राहते. त्यामुळे मतदान झाल्याची ओळख कायम राहते.



डाव्याच हातावर शाई का?


दैनंदिन कामांमध्ये बहुतेक लोक उजव्या हाताचा वापर करतात. शाईतील रसायनांचा अन्नाशी किंवा तोंडाशी थेट संपर्क येऊ नये, यासाठी डाव्या हाताच्या बोटावरच शाई लावण्याची पद्धत अवलंबली जाते.



बोट नसल्यास काय नियम?


जर एखाद्या मतदाराचा डाव्या हातावरील पाहिलं बोटं नसेल, तर डाव्या हातावरील दुसऱ्या बोटावर शाई लावली जाते. डाव्या हातावर एकही बोट नसेल, तर उजव्या हाताच्या बोटावर शाई लावण्याची तरतूद आहे.



दोन्ही हात नसतील तर?


अशा विशेष परिस्थितीत संबंधित मतदाराच्या पायाच्या अंगठ्यावर शाई लावली जाते. त्यामुळे शारीरिक अडचणी असलेल्या नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावता येतो आणि त्याची नोंद ठेवली जाते. मतदान प्रक्रिया सर्वसमावेशक राहावी आणि प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने हे नियम निश्चित केले आहेत.

Comments
Add Comment

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई

ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या

BMC News : पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण

Mumbai 'MB3' Data : मुख्यमंत्रीडेटा ट्रॅफिक'ची कोंडी फुटणार

'इक्विनिक्स'ची मुंबईत मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ हजार कोटींच्या 'एमबी३' डेटा सेंटरचे