उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके


मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेतायेत, त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणेवर बोट ठेवलंय, त्यात त्यांचा राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा आहे.


त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल. हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का? असा आक्षेप एँड आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना नोंदवला.


उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत ज्यावेळेला मतदार जोमाने मतदान करतायेत, दीड वाजेपर्यंत ३० टक्के पार झालंय. मतदार, या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबुतीने ठेवून सहभागी होतायेत, त्यावेळेला हे आरडाओरडा का? ही अडकाठी का? हा स्पीडब्रेकर का? हा गतिरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी, मतदार यांना गतिरोध आहेत का? हा स्पीडब्रेकर आहे का? त्याच्यामागचा हेतू काय? ते प्रेस कॉन्फरन्स का घेतायेत? निवडणूक आयोगाने यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि हे वारंवार करतायेत, असे शेलार म्हणाले.


पहिल्यांदा दोन्ही ठाकरे बंधूंनी आरोप केला की, मतचोरी झाली. मग मतचोरीवरून मतदार यादीतल्या नावांची चोरी झाली. मग मतदार यादीतल्या नावांच्या चोरीनंतर, मतदार नोंदणीच्या असलेल्या एजन्सी आणि कंपन्या यामध्ये चोरी झाली. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान यंत्रात चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग प्रचार करण्याच्या नियम नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग पाडू या यंत्रणेत चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, आता शाईवर चोरी आहे सांगितलं.


या एवढ्या चोऱ्या नाहीत. हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झाला आहे. बुद्धीतली हेराफेरी आहे, चोरी नाही! यांचे सल्लागार सडके आणि हे रडके, अशी अवस्था यांची झाली आहे, असा आरोपही यांनी केला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला