मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबई महापालिकेसाठी २९.९६ टक्के मतदान झाले आहे. हळू हळू मतदानाचा जोर वाढू लागला आहे.


निवडणूक कोणतीही असू दे मुंबईत संध्याकाळी शेवटच्या दोन तासांमध्ये मतदान अनेकदा वाढते. यामुळे यंदाच्या मनपा निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ही किती टक्क्यांनी वाढणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.


सकाळच्या सत्रात मुंबईतल्या अनेक उच्चभ्रू लोकवस्तींमधील मतदार बाहेर पडले नव्हते. यामुळे मतदान नक्की कोणाच्या बाजूने होणार यावरुन तर्कवितर्क सुरू होते. पण हळू हळू मतदान वाढू लागले. मुंबईतल्या वेगवेगळ्या समाजातले मतदार मतदानासाठी बाहेर पडू लागले आहेत. मतदान वाढू लागले आहे.


मतदानाची टक्केवारी वाढू लागली असतानाच विरोधकांनी निवडणूक आयोगाकडून मतदान केलेल्यांच्या बोटाला लावली जाणारी शाई पुसली जाते असा आरोप करायला सुरुवात केली. यावर निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून उत्तर दिले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाही. याची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्याचे नोंद झालेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून पुन्हा मतदान करता येत नाही. मतदाराच्या बोटाला मार्कर पेनद्वारे शाई लावण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी जारी केला आहे. तेव्हापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला मार्कर पेनद्वारे शाई लावली जात आहे. ही शाई बोटाला लावताना नख तसेच बोटाच्या वरच्या बाजूस त्वचेवर तीन ते चार वेळा पेन घासून शाई लावण्याचे निर्देश आहेत.


निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांच्या आरोपातली हवाच काढून घेतली आहे. यानंतर विरोधकांची बोलती बंद झाली आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात