संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या अदलाबदल कार्यक्रमांतर्गत गुजरातच्या जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणलेल्या सिंह मानस आणि सिंहीणी भारती या जोडीने ११ जानेवारी रोजी तीन निरोगी शावकांना जन्म दिला, अशी माहिती उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी दिली. सध्या उद्यानात १३ वाघ व ५ सिंह पिंजऱ्यात असून परिसरात ५० हून अधिक बिबटे मुक्त संचार करत आहेत. मागील वर्षी १६ जानेवारी २०२५ रोजी सिंहिणी मानसी आणि सिंह मानस यांना एका मादीला जन्म दिला होता. ती सध्या निरोगी आहे. या नव्या जन्मामुळे उद्यानातील संवर्धन प्रजनन उपक्रमांना बळ मिळाले असल्याचे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसरंक्षक आणि संचालक अनिता पाटील यांनी सांगितले. तसेच संजय गांधी उद्यानात तीन शावकांचा जन्म ही अभिमानाची बाब असून यामुळे संवर्धन प्रजनन व वैज्ञानिक प्राणी व्यवस्थापनाबाबतची आमची बांधिलकी अधोरेखित होते. प्रत्येक यशस्वी जन्मामागे पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणीपालक व वन कर्मचाऱ्यांचे समर्पित टीमवर्क असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत