संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या अदलाबदल कार्यक्रमांतर्गत गुजरातच्या जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणलेल्या सिंह मानस आणि सिंहीणी भारती या जोडीने ११ जानेवारी रोजी तीन निरोगी शावकांना जन्म दिला, अशी माहिती उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी दिली. सध्या उद्यानात १३ वाघ व ५ सिंह पिंजऱ्यात असून परिसरात ५० हून अधिक बिबटे मुक्त संचार करत आहेत. मागील वर्षी १६ जानेवारी २०२५ रोजी सिंहिणी मानसी आणि सिंह मानस यांना एका मादीला जन्म दिला होता. ती सध्या निरोगी आहे. या नव्या जन्मामुळे उद्यानातील संवर्धन प्रजनन उपक्रमांना बळ मिळाले असल्याचे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसरंक्षक आणि संचालक अनिता पाटील यांनी सांगितले. तसेच संजय गांधी उद्यानात तीन शावकांचा जन्म ही अभिमानाची बाब असून यामुळे संवर्धन प्रजनन व वैज्ञानिक प्राणी व्यवस्थापनाबाबतची आमची बांधिलकी अधोरेखित होते. प्रत्येक यशस्वी जन्मामागे पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणीपालक व वन कर्मचाऱ्यांचे समर्पित टीमवर्क असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला