ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच


वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा) कंपनीतील कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेले सत्याग्रह आंदोलन आज सहाव्या दिवशीही अधिक तीव्र झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून पगार रखडल्याने आक्रमक झालेल्या कामगारांनी, जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कंपनीचे गेट सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनर्स बनवणाऱ्या या नामांकित कंपनीत अनेक कामगार गेल्या २८ वर्षांपासून इमानेइतबारे सेवा देत आहेत. मात्र, व्यवस्थापनाने मागील दोन महिन्यांपासून या कायमस्वरूपी कामगारांचे पगार रोखून धरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या कामगारांना पगार नाही, तर दुसरीकडे कार्यालयीन कर्मचारी कामावर न येताही त्यांना पगार दिला जात असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे. "हा दुजाभाव का?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ८ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्याग्रहाला संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव आणि तालुका अध्यक्ष राजू जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे कामगारांचे मनोधैर्य उंचावले असून आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.


कामगारांच्या मागण्या :




  • मागील दोन महिन्यांचा थकीत पगार तत्काळ खात्यात जमा करावा.

  • कामगार आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्यातील पगाराबाबतचा दुजाभाव थांबवावा.

  •  २८ वर्षांपासून सेवा देणाऱ्या ज्येष्ठ कामगारांना सन्मानाची वागणूक द्यावी.

Comments
Add Comment

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी

हुतात्म्यांवर गोळीबार करणारे काँग्रेसचेच राज्यकर्ते!

ठाकरे गटाला विसर पडलाय; रवींद्र चव्हाणांची टीका मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या

मकरसंक्रांतीच्या दिवशी का खातात खिचडी ?

मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या