Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भगवान अय्यप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या तुपाच्या विक्रीत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले असून, केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (VACB) या प्रकरणाच्या तळाशी जाऊन एका महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. हा घोटाळा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ च्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मंदिराच्या दक्षता अधिकाऱ्यांनी केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात (Audit) पैशांची मोठी तफावत दिसून आली. या प्रकरणी त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे (TDB) काउंटर इन्चार्ज सुनील पोटी यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. भाविकांना दिल्या जाणाऱ्या 'आथिया षष्ठम' प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या हिशेबात ही गडबड झाली आहे.



असे आहे घोटाळ्याचे गणित


सबरीमाला मंदिरात भाविक नारळ आणि तूप अर्पण करतात, ज्याची पुनर्विक्री बोर्डाद्वारे १०० मिलीच्या पॅकेटमध्ये केली जाते. प्रत्येक पॅकेटची किंमत १०० रुपये निश्चित आहे.


विक्रीसाठी आलेली पाकिटे : १७ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २०२५ दरम्यान ३,५२,०५० पाकिटे पॅक केली गेली.


विक्रीची नोंद : मराठमठ इमारतीतील काउंटरवरून ८९,३०० पाकिटांची विक्री झाल्याचे दाखवण्यात आले.


रुपयांचा हिशेब : नियमानुसार ८९,१२९ पाकिटांचे पैसे जमा व्हायला हवे होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी केवळ ७५,४५० पाकिटांचीच रक्कम जमा केली.


अपहार : तब्बल १३,६७९ पाकिटांचे पैसे, म्हणजेच अंदाजे १३ लाख ६७ हजार ९०० रुपये तिजोरीत जमा झालेच नाहीत.



न्यायालयाची कडक टिप्पणी


उच्च न्यायालयाने या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, "इतक्या कमी कालावधीत झालेली ही तफावत केवळ हिशेबातील चूक असू शकत नाही. यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही." कंत्राटदाराला पाकीट बनवण्यासाठी मिळणारे २० पैसे आणि बोर्डाचे साहित्य असतानाही झालेला हा अपहार चिंताजनक आहे. आता या घोटाळ्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत, हे दक्षता विभागाच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.