'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा


नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या कोणत्याही साहसाला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सुरू केलेले 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच आहे," अशा कडक शब्दांत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.


लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरवेळी जम्मू -काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराने जवळपास १०० पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. १० मे रोजी शस्त्रसंधी झाल्यानंतर जम्मू -काश्मीर मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतीय लष्कर सीमेवर अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचा पुनरूच्चार यावेळी द्विवेदी यांनी केला. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, जम्मू-काश्मीर मधील दहशतवाद्यांचा आकडा आता एकअंकी आहे.” दहशतवादी संघटनांना जाऊन मिळणाऱ्या तरूणांची संख्या शून्य असल्याचे द्विवेदी म्हणाले. लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले की, गरज पडल्यास भारतीय लष्कर पुन्हा एकदा 'ग्राउंड ऑफेंसिव्ह' करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. पाकिस्तानकडून होणाऱ्या कृत्याला भारतीय लष्कर अत्यंत प्रभावीपणे आणि ताकदीने उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


चीन सीमेबाबतही स्पष्ट भूमिका :


एलएसीवरील परिस्थितीबाबत बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, "चीनसोबत राजनैतिक चर्चा सुरू असली, तरी लष्करी सज्जतेत कोणतीही कपात केलेली नाही. पायाभूत सुविधांच्या विकासावर आमचा भर असून आमचे जवान कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत."

Comments
Add Comment

Rajasthan Teacher Suspended : संतापजनक कृत्य..! ५०० रुपये चोरीच्या संशयावरून विद्यार्थिनींना केलं विवस्त्र

सवाई माधोपूर : राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ५०० रुपये

Krishna controversy : 'श्रीकृष्ण मुस्लिम होता', मौलानाचा दावा; व्हायरल व्हिडिओवरून नवा वाद, हिंदू संघटनांकडून कारवाईची मागणी

श्रीकृष्णावरून वाद; हिंदू संघटना संतापली मथुरा : श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच एका

Supreme Court on Three-Language Policy : त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी; 'नववीपासून नवी भाषा म्हणजे विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण'

नवी दिल्ली : इयत्ता नववीपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी

Bay of Bengal Tragedy : बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या दोन बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती

ढाका/यांगून : म्यानमारमधून पलायन करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट कोसळले आहे. बंगालच्या उपसागरात

Pimple Solution : चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात? 'या' सोप्या उपायांनी मिळवा स्वच्छ, नितळ त्वचा

पिंपल्स का

ISRO scientists resign : मोठी बातमी! गगनयानसारख्या मोहिमांवर काम करणाऱ्या १०० हून अधिक शास्त्रज्ञांनी सोडली 'इस्रो'; राजीनाम्यांचे नियम आता होणार कडक!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गगनयानसारख्या देशाच्या अत्यंत