मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात


मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि मतमोजणीपर्यंतीची महत्त्वाची प्रक्रिया शांततेत, मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचा दावा मंगळवारी मुंबई पोलिसांनी केला.


मंगळवारी संध्याकाळी ५ च्या ठोक्याला निवडणूक प्रचार थांबला. प्रत्यक्षात त्यानंतरच पैसेवाटप, वस्तू वाटप सुरू होते, या अनुभवामुळे दाट लोकवस्तीचे, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रभागांमध्ये पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत विशेष उपाययोजना आखल्या आहेत. यात गस्त वाढवणे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबतचा समन्वय दृढ केल्याचे सांगण्यात आले. ठरावीक धर्म, समाज, भाषिक नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडूच नये या उद्देशाने ठरावीक राजकीय पक्ष स्वतःच्या सोयीने रणनिती आखतात. त्यामुळे त्या त्या प्रभागातील मतदानाचा टक्का घसरतो. असे प्रकार घडू नयेत, बोगस मतदान होऊ नये यासाठी सर्वत्र करडी नजर ठेवून आहोत, असे मुंबई पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आले.


ठाकरे बंधूंनी बोगस मतदान, दुबार मतदान टाळण्याच्या उद्देशाने भगवा गार्ड या नावाने कार्यकर्त्यांची फौज प्रत्येक मतदान केंद्राबाहेर तैनात ठेवू, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष, राजकीय शत्रुत्वातून उद्भवणारी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले.


२५ हजार पोलीस तैनात : १५ जानेवारी रोजी आयुक्त देवेन भारती यांच्या थेट देखरेखीखाली १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपआयुक्त, ८४ सहायक आयुक्त यांच्यासह तीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि २५ हजाराहून अधिक अंमलदार असा ताफा शहराच्या कानाकोपऱ्यात तैनात असेल. संवेदनशील प्रभागांमध्ये पोलीस बंदोबस्तासह एसआरपीएफ, क्युआरटी, बीडीडीएस, आरसीपी, गृहरक्षक दल आदी विशेष तुकड्या तैनात ठेवल्या जातील, असे सांगण्यात आले.


Comments
Add Comment

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता

Mantri Ashish Shelar : दशावतार लोककलेला राजाश्रय मिळणार

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; मंडळांच्या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य

Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सात दिवसांत अहवाल तयार करा

मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल

Labour Minister Adv. Akash Fundkar : 'पॉश' कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश     मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण