मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात


मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि मतमोजणीपर्यंतीची महत्त्वाची प्रक्रिया शांततेत, मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचा दावा मंगळवारी मुंबई पोलिसांनी केला.


मंगळवारी संध्याकाळी ५ च्या ठोक्याला निवडणूक प्रचार थांबला. प्रत्यक्षात त्यानंतरच पैसेवाटप, वस्तू वाटप सुरू होते, या अनुभवामुळे दाट लोकवस्तीचे, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रभागांमध्ये पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत विशेष उपाययोजना आखल्या आहेत. यात गस्त वाढवणे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबतचा समन्वय दृढ केल्याचे सांगण्यात आले. ठरावीक धर्म, समाज, भाषिक नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडूच नये या उद्देशाने ठरावीक राजकीय पक्ष स्वतःच्या सोयीने रणनिती आखतात. त्यामुळे त्या त्या प्रभागातील मतदानाचा टक्का घसरतो. असे प्रकार घडू नयेत, बोगस मतदान होऊ नये यासाठी सर्वत्र करडी नजर ठेवून आहोत, असे मुंबई पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आले.


ठाकरे बंधूंनी बोगस मतदान, दुबार मतदान टाळण्याच्या उद्देशाने भगवा गार्ड या नावाने कार्यकर्त्यांची फौज प्रत्येक मतदान केंद्राबाहेर तैनात ठेवू, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष, राजकीय शत्रुत्वातून उद्भवणारी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले.


२५ हजार पोलीस तैनात : १५ जानेवारी रोजी आयुक्त देवेन भारती यांच्या थेट देखरेखीखाली १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपआयुक्त, ८४ सहायक आयुक्त यांच्यासह तीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि २५ हजाराहून अधिक अंमलदार असा ताफा शहराच्या कानाकोपऱ्यात तैनात असेल. संवेदनशील प्रभागांमध्ये पोलीस बंदोबस्तासह एसआरपीएफ, क्युआरटी, बीडीडीएस, आरसीपी, गृहरक्षक दल आदी विशेष तुकड्या तैनात ठेवल्या जातील, असे सांगण्यात आले.


Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील