Harbour Line Gets AC Local : हार्बरच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! २६ जानेवारीला धावणार पहिली एसी लोकल, प्रवास होणार गारेगार

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. मुंबईत दररोज लाखो प्रवासी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन मुख्य मार्गांवरून प्रवास करत असतात. मात्र, आत्तापर्यंत केवळ मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनाच वातानुकूलित (AC) लोकलची सुविधा मिळत होती. हार्बर मार्गावरील प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून या सुविधेच्या प्रतीक्षेत होते, पण आता त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मुंबई आणि उपनगरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी हार्बर रेल्वे हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या तुलनेत हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना आधुनिक सोयी-सुविधांपासून काहीसे लांब राहावे लागत होते. उन्हाळा आणि गर्दीच्या काळात उष्णतेचा सामना करणाऱ्या प्रवाशांनी सातत्याने एसी लोकलची मागणी केली होती. प्रशासनाने आता या मागणीची दखल घेतली असून, हार्बर रेल्वेवरही लवकरच वातानुकूलित लोकल धावणार असल्याची चिन्हे आहेत. एसी लोकल सुरू झाल्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होईल. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर तांत्रिक चाचण्या आणि वेळापत्रकाचे नियोजन सुरू असून, लवकरच अधिकृतरीत्या ही सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, अशी दाट शक्यता आहे. यामुळे हार्बर लाईनवरील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.



हार्बरच्या ट्रॅकवर आता 'थंडगार' प्रवास


गेल्या अनेक वर्षांपासून वातानुकूलित (AC) लोकलची वाट पाहणाऱ्या हार्बरच्या प्रवाशांचे स्वप्न अखेर पूर्ण होत असून, २६ जानेवारीपासून या मार्गावर पहिली एसी लोकल अधिकृतपणे धावणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही रेल्वे प्रशासनाकडून हे विशेष गिफ्ट मिळाले आहे. ही नवीन एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल या मुख्य मार्गावर चालवली जाणार आहे. सोमवार ते शनिवार या कालावधीत ही लोकल प्रवाशांच्या सेवेत असेल. विशेष म्हणजे, दररोज या लोकलमधून एकूण १४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अप दिशेने ७ आणि डाऊन दिशेने ७ अशा प्रत्येकी ७ फेऱ्या धावणार असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या एसी लोकलची सुविधा केवळ पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरच उपलब्ध होती. हार्बर रेल्वेचे प्रवासी केवळ साध्या लोकलवर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात आणि गर्दीच्या वेळी त्यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, आता २६ जानेवारीपासून हार्बर मार्गाचाही चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना 'गारेगार' प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.



वेळापत्रक कसं असणार ?


चेन्नईहून मुंबईत दाखल झालेली अत्याधुनिक एसी लोकल आता खास हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या ऑपरेशन विभागाने पाठवलेला प्रस्ताव मान्य झाल्याने २६ जानेवारीपासून हार्बरच्या रुळांवर एसी लोकलचा गारवा धावणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही एसी लोकल केवळ सीएसएमटी ते पनवेल मर्यादित न राहता वाशी ते वडाळा रोड, पनवेल ते वडाळा रोड आणि पनवेल ते सीएसएमटी अशा विविध टप्प्यांवर प्रवाशांना सेवा देणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रात्रीच्या फेऱ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. अप मार्ग: पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) दिशेने शेवटची एसी लोकल संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांनी सुटेल. डाऊन मार्ग: सीएसएमटी येथून पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची एसी फेरी रात्री ८ वाजता रवाना होईल. ही नवीन ट्रेन प्राधान्याने हार्बर मार्गावरच चालवण्याचा आग्रह ऑपरेशन विभागाने धरला होता, ज्याला आता वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे हार्बर लाईनवरील प्रवाशांचा प्रवास केवळ सुखकरच होणार नाही, तर कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना रात्रीच्या वेळीही वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या सेवेमुळे हार्बर रेल्वेच्या इतिहासात एक नवे पान जोडले जाणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही आता 'स्वीकृत सदस्य'

मुंबई : महापालिका, नगरपालिकांप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्यां'च्या नियुक्तीचा

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री नुकसानभरपाई जाहीर करणार

मुंबई : कोकणातील आंबा व काजू पिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री

धर्मांतर विरोधी विधेयकात घुमला २००४ चा आवाज, डॉ. नीलम गोऱ्हेंनी सभागृहात जागवल्या जुन्या आठवणी

मुंबई: महाराष्ट्रात प्रलोभन किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या समस्येला आळा घालण्यासाठी आज विधान परिषदेत

धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा