Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच मित्राने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवुन आरोपीने थेट मित्रावर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात १९  वर्षीय तौकीर आरीफ शेख याच्यावर अतिफ शेख याने हल्ला केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८जानेवारी रोजी तौकीर आणि त्याच्या मित्रांचा मित्र अतिफ शेख यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर अतिफने तौकीरला फोन करून धमकी दिली होती, तसेच शिवीगाळ करत परिणामांची चेतावणी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. १०  जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास तौकीर आपल्या नातेवाईकाला सायन सर्कलवर सोडून लालमिट्टी किस्मतनगर परिसरात परत आला होता. तो एका मित्राला भेटण्यासाठी तेथे थांबला असताना अचानक अतिफ शेख तेथे आला. आरोपीने तौकीरला पाहताच शिवीगाळ सुरू केली. तौकीरने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिफने रागाच्या भरात त्याच्यावर जोरदार हल्ला केला.

या हल्ल्यात आरोपीने तौकीरच्या मान आणि कानावर जोरात चावा घेतल्याचा आरोप असून, त्यामुळे तौकीर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिक घाबरून गेले. तौकीरच्या मदतीला धावून आलेल्या नागरिकांनाही आरोपीने धमकावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी अतिफ शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Comments
Add Comment

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य