कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल


मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी प्रशासनाने 'विनातिकीट' प्रवाशांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षभरात (२०२५) राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांमुळे कोकण रेल्वेच्या तिजोरीत दंडापोटी तब्बल २०.२७ कोटी रुपयांची भर पडली असून ३ लाख ६८ हजारांहून अधिक अनियमित प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे.


केवळ डिसेंबर २०२५ या एका महिन्यात रेल्वेने ९९८ मोहिमा राबवल्या. यामध्ये ४३,८९६ फुकट्या प्रवाशांकडून २.४५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती.


कोकण रेल्वेवर पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळुर ते उडुपीदरम्यान धावली. रोहा – वीर – खेड – सावंतवाडी या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षे ३ महिने कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर १९९८-९९ सालापासून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यास सुरुवात झाली. कोकण रेल्वेवरून दर आठवड्याला ४३ ते ४५ नियमित गाड्या धावतात.


याशिवाय उन्हाळी सुट्ट्या आणि गणेशोत्सवाच्या काळात चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या ४ ते ५ हजारांपर्यंत जाते. अशा वेळी अधिकृत तिकीटधारकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक विशेष गाडीमध्ये तपासणी पथकाद्वारे कडक चेकिंग केले जात आहे.


वर्षभरातील मोहिमेचा लेखाजोखा (जानेवारी-डिसेंबर २०२५) :


कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या ७४० किमीच्या मार्गावर रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणी पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली.


एकूण कारवाया : ८,४८१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा.


पकडलेले प्रवासी : ३,६८,९०१ (अनधिकृत आणि अनियमित प्रवासी).


वसूल केलेला दंड : २० कोटी २७ लाख रुपये.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२