BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी, १५ जानेवारी रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, गुरुवारी १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे . पण यंदा मुंबई महापालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, त्यामुळे सर्व निकाल एकाच वेळी जाहीर होणार नाहीत.


२०१७ च्या निवडणुकीप्रमाणे यंदा मुंबईतील २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार नाही. याऐवजी यंदा मतमोजणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, ही प्रक्रिया एकूण पाच टप्प्यांत पार पडणार आहे. प्रत्येक टप्प्यात साधारण ४६ वॉर्डांची मतमोजणी केली जाणार आहे. मुंबई शहरात एकूण २३ मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक केंद्रावर साधारण दहा प्रभागांची जबाबदारी एका मतमोजणी अधिकाऱ्याकडे असणार असली, तरी एका वेळी फक्त दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच निकाल स्पष्ट होऊ शकणार आहेत.


निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नव्या पद्धतीमुळे उपलब्ध मनुष्यबळ कमी प्रभागांवर केंद्रित करता येणार असून, मतमोजणी अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडणे शक्य होणार आहे. मात्र, यामुळे सर्व प्रभागांचे कल एकाच वेळी समोर येणार नाहीत. काही वॉर्डांचे निकाल सकाळीच जाहीर होतील, तर काही वॉर्डांचे निकाल दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या पाच टप्प्यांच्या फॉर्म्युल्यामुळे यंदा मुंबई महापालिकेच्या अंतिम चित्रासाठी नागरिकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोणत्या प्रभागाचा निकाल आधी आणि कोणाचा उशिरा लागणार, याबाबत मतदारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होण्यासाठी यंदा संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)