शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून मिळवलेला फंड कुठे गेला?


अमित साटम यांचा राज ठाकरेंना सवाल; कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या?


मुंबई : "ठाकरेंनी १९९७ साली शिवउद्योग सेनेची स्थापना केली. फंड मिळवले. पण त्यातून किती तरुणांना उद्योग मिळाला? किती मराठी तरुणांना यांनी मोठे केले? याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी द्यावे. ठराविक एका उद्योगपतीला टार्गेट करणारे राज ठाकरे स्वतःची आर्थिक प्रगती कोहिनूर मॉलच्या माध्यमातून कशी झाली यावर कधी बोलणार आहेत? कोहिनूर मीलच्या जागेवर उभारलेल्या कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे," असे आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मंगळवारी दिले.


राज ठाकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना, "माझा कोणत्याही उद्योग-धंद्यांना विरोध नाही. मात्र एकाच उद्योगपतीने दहा वर्षांत एवढी मोठी झेप घेणं खटकतंय," असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना साटम म्हणाले, "काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा उघडकीस आणला. महाराष्ट्रात उद्योग कशाप्रकारे आले यावर विस्तृत विश्लेषण दिले. यावर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. उद्योगांना माझा विरोध नाही मात्र कमी वेळात मोठे होणाऱ्या उद्योगपतींवर माझा आक्षेप आहे असे म्हटले आहे. परंतु, मराठी तरुणांना उद्योजक बनवायची नीती देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागची काही वर्षे करत आहेत. पण या ठाकरे बंधूंनी मराठी तरुणांना उद्योगाच्या नावाखाली वडापावाच्या गाडीपर्यंतच मर्यादित ठेवले आहे."


साटम म्हणाले, "राज ठाकरे नेहमी मराठीविषयी बोलत असतात. मात्र, या ठाकरेंची मुले मराठी शाळांमध्ये न जाता बॉम्बे स्कॉटिश नावाच्या शाळेत का शिकली? कॉलेजमध्ये त्यांनी जर्मन आणि फ्रेंच या भाषा का शिकल्या? याचेही उत्तर राज ठाकरेंनी द्यावे. मनाचा मोठेपणा जपणाऱ्या मराठी माणसाची बदनामी करणाऱ्या राज ठाकरेंना शेवटी मी खुले आव्हान देतोय, की त्यांनी आपल्या नातवाचा प्रवेश बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत घेऊन दाखवावा," असाही टोला साटम यांनी राज ठाकरेंना लगावला.


"अदानींबद्दल जर ठाकरेंचे ठाम मत असेल तर त्यांनी अदानींच्या गळाभेटी का घेतल्या? त्यांना घरी का बोलवलं? अदानींची कंपनी काही नवीन नाही. त्यामुळे एखाद्याला उगाचच टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे. भ्रष्टाचाराची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेत राहून कशाप्रकारे पापाचा पैसा लाटला हे सर्वश्रुत आहे. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे", अशी टीका अमित साटम यांनी केली.


Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली