शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून मिळवलेला फंड कुठे गेला?


अमित साटम यांचा राज ठाकरेंना सवाल; कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या?


मुंबई : "ठाकरेंनी १९९७ साली शिवउद्योग सेनेची स्थापना केली. फंड मिळवले. पण त्यातून किती तरुणांना उद्योग मिळाला? किती मराठी तरुणांना यांनी मोठे केले? याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी द्यावे. ठराविक एका उद्योगपतीला टार्गेट करणारे राज ठाकरे स्वतःची आर्थिक प्रगती कोहिनूर मॉलच्या माध्यमातून कशी झाली यावर कधी बोलणार आहेत? कोहिनूर मीलच्या जागेवर उभारलेल्या कोहिनूर मॉलमध्ये किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? याचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावे," असे आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मंगळवारी दिले.


राज ठाकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना, "माझा कोणत्याही उद्योग-धंद्यांना विरोध नाही. मात्र एकाच उद्योगपतीने दहा वर्षांत एवढी मोठी झेप घेणं खटकतंय," असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना साटम म्हणाले, "काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा उघडकीस आणला. महाराष्ट्रात उद्योग कशाप्रकारे आले यावर विस्तृत विश्लेषण दिले. यावर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. उद्योगांना माझा विरोध नाही मात्र कमी वेळात मोठे होणाऱ्या उद्योगपतींवर माझा आक्षेप आहे असे म्हटले आहे. परंतु, मराठी तरुणांना उद्योजक बनवायची नीती देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागची काही वर्षे करत आहेत. पण या ठाकरे बंधूंनी मराठी तरुणांना उद्योगाच्या नावाखाली वडापावाच्या गाडीपर्यंतच मर्यादित ठेवले आहे."


साटम म्हणाले, "राज ठाकरे नेहमी मराठीविषयी बोलत असतात. मात्र, या ठाकरेंची मुले मराठी शाळांमध्ये न जाता बॉम्बे स्कॉटिश नावाच्या शाळेत का शिकली? कॉलेजमध्ये त्यांनी जर्मन आणि फ्रेंच या भाषा का शिकल्या? याचेही उत्तर राज ठाकरेंनी द्यावे. मनाचा मोठेपणा जपणाऱ्या मराठी माणसाची बदनामी करणाऱ्या राज ठाकरेंना शेवटी मी खुले आव्हान देतोय, की त्यांनी आपल्या नातवाचा प्रवेश बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत घेऊन दाखवावा," असाही टोला साटम यांनी राज ठाकरेंना लगावला.


"अदानींबद्दल जर ठाकरेंचे ठाम मत असेल तर त्यांनी अदानींच्या गळाभेटी का घेतल्या? त्यांना घरी का बोलवलं? अदानींची कंपनी काही नवीन नाही. त्यामुळे एखाद्याला उगाचच टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे. भ्रष्टाचाराची भाषा करणाऱ्या ठाकरेंनी २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेत राहून कशाप्रकारे पापाचा पैसा लाटला हे सर्वश्रुत आहे. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे", अशी टीका अमित साटम यांनी केली.


Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये