कधी होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक ?


मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची घोषणा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आज म्हणजेच मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद बोलावली आहे.


कोविड संकट आणि न्यायालयाच्या पातळीवर प्रलंबित असलेल्या आरक्षणाशी संबंधित याचिकांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर पडत होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्यात याव्यात असे निर्देश दिले. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली. आता १५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. महापालिकांसाठी मतमोजणी लगेच १६ जानेवारी रोजी होणार आहे.


महापालिकांच्या निवडणुकांनंतर राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यातल्या निवडक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक अडचणीत सापडली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत सुनावणी घेतली. यावेळी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीला न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. तर इतर सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी २१ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून १० फेब्रुवारीपर्यंत सर्व निवडणुका घेऊ असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज म्हणजेच मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद बोलावली आहे.


Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने