कधी होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक ?


मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची घोषणा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आज म्हणजेच मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद बोलावली आहे.


कोविड संकट आणि न्यायालयाच्या पातळीवर प्रलंबित असलेल्या आरक्षणाशी संबंधित याचिकांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर पडत होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्यात याव्यात असे निर्देश दिले. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली. आता १५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. महापालिकांसाठी मतमोजणी लगेच १६ जानेवारी रोजी होणार आहे.


महापालिकांच्या निवडणुकांनंतर राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यातल्या निवडक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक अडचणीत सापडली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत सुनावणी घेतली. यावेळी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीला न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. तर इतर सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी २१ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून १० फेब्रुवारीपर्यंत सर्व निवडणुका घेऊ असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज म्हणजेच मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद बोलावली आहे.


Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाची हत्या

झिंतान : लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफीची गोळ्या झाडून

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर