अंबरनाथ नगर परिषद शिवसेनेने राखली

उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील


अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेत सोमवारी उपनगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठी राजकीय घडामोड पाहवयास मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तिरक्या चालींमुळे भाजपचे नेते रवींद्र चव्हाण ‘चेकमेट’ झाले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक असूनही, शिवसेना (शिंदे) गटाचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्षपदावर विजयी झाले. सोमवारी निवडीपूर्वी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी नगरपालिका परिसरात मोठी घोषणाबाजी केली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला.


अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये एकूण ५९ नगरसेवक आहेत. यातील काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपचे स्वबळावर १४ नगरसेवक होते. काँग्रेसच्या १२ नगरसेवकांपैकी काहींचा निलंबन झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे ‘अंबरनाथ विकास आघाडी’ नावाचा गट तयार झाली. या आघाडीमध्ये ३१ जणांचा समूह जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवला होता, जे बहुमतापेक्षा जास्त संख्या मानली जात होती. या आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी अचानक शिवसेना (शिंदे) गटाला पाठिंबा जाहीर केला, ज्यामुळे शिवसेनेचे पारडे जड झाले. यामुळे भाजपने अख्खा काँग्रेस पक्ष फोडूनही विजय मिळवता
आला नाही.


उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदाशिव पाटील यांना ३२ मते, तर भाजपप्रणीत आघाडीच्या उमेदवाराला २८ मते मिळाली. या निकालामुळे श्रीकांत शिंदेंपुढे रवींद्र चव्हाण गारद झाले आहेत. अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेच्या प्रभावाची स्पष्ट झलक दिसून आली. निवडणूक वेळेस सर्वसाधारण सभेत जोरदार गोंधळही n पाहवयास मिळाला.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना