ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीलाच पोलिसांनी घातपात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करत दोन आरोपींना माणगाव पोलिसांनी अटक केली. तालुक्यातील पुणे दिघी महामार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीतील सीक्रेट पॉईंटजवळ दि. ११ जानेवारी रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. फिर्यादी हे जागा दाखविण्यासाठी गेले असता २५ ते ३० वर्षे, वयोगटातील पुरुष निपचिप अवस्थेत दिसून आला. तत्काळ त्यांनी माणगाव पोलिसांना संपर्क साधला असता माणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मयत इसमाच्या अंगावर डाव्या बाजुच्या खांद्याच्या खाली, गळ्याला व डोक्याला जखमा दिसल्या. तसेच जमिनीवर सुखलेल्या रक्ताचे डाग दिसले. परंतु, सदर व्यक्तीची ओळख पटत नव्हती. मयत इसमाच्या अंगावरील खुणा पाहून घातपात असल्याचा संशय पोलिसांनी आला. त्यानुसार माणगाव पोलिसांनी शोध घेऊन पुणे येथून आरोपी अनिकेत वाघमारे आणि तुषार उर्फ सोन्या पाटोळे यांना २४ तासाच्या आत अटक केली. घटनेचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे