ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीलाच पोलिसांनी घातपात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करत दोन आरोपींना माणगाव पोलिसांनी अटक केली. तालुक्यातील पुणे दिघी महामार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीतील सीक्रेट पॉईंटजवळ दि. ११ जानेवारी रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. फिर्यादी हे जागा दाखविण्यासाठी गेले असता २५ ते ३० वर्षे, वयोगटातील पुरुष निपचिप अवस्थेत दिसून आला. तत्काळ त्यांनी माणगाव पोलिसांना संपर्क साधला असता माणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मयत इसमाच्या अंगावर डाव्या बाजुच्या खांद्याच्या खाली, गळ्याला व डोक्याला जखमा दिसल्या. तसेच जमिनीवर सुखलेल्या रक्ताचे डाग दिसले. परंतु, सदर व्यक्तीची ओळख पटत नव्हती. मयत इसमाच्या अंगावरील खुणा पाहून घातपात असल्याचा संशय पोलिसांनी आला. त्यानुसार माणगाव पोलिसांनी शोध घेऊन पुणे येथून आरोपी अनिकेत वाघमारे आणि तुषार उर्फ सोन्या पाटोळे यांना २४ तासाच्या आत अटक केली. घटनेचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ