Bluetooth सुरु ठेवण पडेल महागा,बँक खातं रिकामं होण्याचा धोका..! पहा काय आहे विषय ?

Bluetooth :आजच्या जमान्यात स्मार्टफोन हा सर्व लोकांची गरज बनला आहे. पण याच फोनमधील ब्लुटूथ तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. स्मार्टफोनचा वापर आज सर्वसामान्य झाला असून इअरफोन, स्पीकर, स्मार्टवॉच यांसारख्या उपकरणांसाठी ब्लुटूथचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, गरज नसताना फोनचे ब्लुटूथ सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. ब्लुटूथशी संबंधित ‘ब्लुजॅकिंग’सारख्या घोटाळ्यांमुळे बँक खात्यातील पैसेही लंपास होऊ शकतात.

अनेक वेळा इअरफोन किंवा इतर अ‍ॅक्सेसरीज डिस्कनेक्ट झाल्यानंतरही नागरिक ब्लुटूथ बंद करायला विसरतात. ब्लुटूथ सुरू ठेवण्यात काहीही धोका नाही, असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी – जसे की ट्रेन, बस, बाजारपेठ किंवा मॉल – ब्लुटूथ ऑन असल्यास सायबर गुन्हेगारांना फोनमध्ये घुसखोरी करण्याची संधी मिळते. स्कॅमर्स अज्ञात ब्लुटूथ पेअरिंग विनंत्या पाठवतात आणि चुकून त्या स्वीकारल्यास हॅकर्सना फोनमध्ये प्रवेश मिळू शकतो. एकदा फोनमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर संकेतशब्द, डेबिट-क्रेडिट कार्ड तपशील, ओटीपी आणि बँकिंग अ‍ॅप्समधील माहिती चोरणे घोटाळेबाजांसाठी सोपे होते. या माहितीच्या आधारे ते बँक खात्यातील रक्कम काढू शकतात. या प्रकारच्या फसवणुकीला ‘ब्लुजॅकिंग’ असे म्हटले जाते.

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही अ‍ॅक्सेसरी कनेक्ट नसेल तर ब्लुटूथ बंद ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी ब्लुटूथ बंद करणे सुरक्षित ठरते. अज्ञात डिव्हाइसशी कधीही कनेक्ट होऊ नये आणि ब्लुटूथ ‘नॉन-डिस्कव्हरेबल’ मोडमध्ये ठेवावा. तसेच, मोबाईलचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स नियमितपणे अपडेट ठेवावेत.
Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी