रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत


अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष एक मोठा आधारवड ठरला आहे. १ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत या कक्षाद्वारे ४७ लाख २० हजार रुपयांची आर्थिक मदत रुग्णांना वितरित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या अहवालातून ही सकारात्मक माहिती समोर आली आहे.
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यलयात हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार खेटे मारावे लागतात. यात रुग्ण व नातेवाइकांची होणारी परवड थांबविण्याच्या उद्देशातून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजनेच्या माध्यमातूनही अनेक रुग्णांना उपचारांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मोठी कामगिरी केली आहे.


नमो नेत्र संजीवनी अभियान अंतर्गत १९९ शिबिरांद्वारे ५ हजार ९९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. श्री गणेशा आरोग्याचा अभियानातून १५३ शिबिरांच्या माध्यमातून ७ हजार ३४१ लाभार्थीची तपासणी झाली, तसेच रक्तदान अभियानातून आयोजित ५ रक्तदान शिबिरांतून २१२ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. दरम्यान, आरोग्य सेवेसोबतच नैसर्गिक आपत्तीमध्येही या कक्षाने योगदान दिले आहे. पूरग्रस्तांसाठी ८ लाख ९० हजार रुपयांच्या देणग्या जमा करून मदत पोहोचविण्यात आली, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रचारासाठी राबविलेल्या २२ उपक्रमांमध्ये ५ हजार ७७८ नागरिकांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे योजनेची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाशी सध्या ३८ रुग्णालये संलग्न असून, १५ रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे रायगडमधील सामान्य जनतेला आरोग्य सुविधा मिळवणे सुलभ झाले.

Comments
Add Comment

इराणकडून सौदीच्या यानबू बंदरातील समरेफ रिफायनरीवर हवाई हल्ला; जागतिक तेल बाजारात खळबळ

सौदी अरेबियाच्या लाल समुद्र किनाऱ्यावर असलेल्या यानबू बंदरगाहातील सौदी अरामको आणि एक्सॉनमोबिल यांच्या

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच