भारत व जर्मनी यांचा व्यापार ५० अब्ज डॉलर पार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ (Friedrich Merz) यांनी नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर जर्मनी व भारत यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी भारत व जर्मनी यांनी एकूण ५० अब्ज डॉलरचा टप्पा पार केल्या असल्याचेही यावेळी नमूद केले. एका कार्यक्रमात दोन्ही देशांच्या उद्योगपतींनी, विविध कार्यकारी अधिकारी यांनी या सीईओ फोरममध्ये उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे दिसून आले होते. यावेळी भारतात २००० कंपन्याहून अधिक जर्मन कंपन्यांचा समावेश असल्यामुळे भारत व जर्मनी यांच्या औद्योगिक संबंधांत मजबूती असल्याचे उद्धृत होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्या उपस्थितीत दोन्ही देशातील विविध व्यापारी सामंजस्य करारावर (Memoreundum of Understanding MoU) स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आहेत. तंत्रज्ञान, उद्योग, कौशल्य विकास, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, रिसर्च, शाश्वत विकास यांसारख्या अनेक क्षेत्रांत दोन्ही देशांच्या संबंधात हितकारक व लाभदायक संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी दोन्ही देशांच्या धोरणकर्तांनी प्रयत्न करण्याचे ठरवले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आत्मविश्वास आज सकाळी भारत-जर्मनी सीईओ फोरममध्ये स्पष्टपणे दिसून आला असे म्हटले. हे केंद्र ज्ञान देवाणघेवाण, तंत्रज्ञान विकास आणि नाविन्यपूर्णतेसाठी एक सामायिक व्यासपीठ म्हणून काम करेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले आहेत.


तंत्रज्ञान सहकार्याच्या प्रकाश टाकताना, पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे की,दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान सहकार्य वर्षानुवर्षे अधिक मजबूत झाले आहे आणि त्याचा परिणाम आता जमिनीवर स्पष्टपणे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि जर्मनीची अक्षय ऊर्जा क्षेत्रात समान प्राधान्ये आहेत आणि त्यांनी भारत जर्मनी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्याच्या निर्णयाची घोषणा यावेळी केली.

Comments
Add Comment

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी!

अतिवृष्टीमुळे काढणीला उशीर; अनेक शेतकरी एमएसपीपासून वंचित राहण्याची भीती चंद्रपूर - राज्याचे माजी वने,

Supreme Court : आरक्षण मर्यादा ओलांडून निवडणूक घेणे अमान्य - सुप्रीम कोर्ट

राज्यातील २० जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता

सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ समृध्‍द लोकशाहीसाठी आश्‍वासक बाब दिनांक ४ जुलै