हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधू एकत्र

मंत्री नितेश राणे यांनी घेतला ठाकरे बंधूंचा समाचार


ठाकरे पुत्रांपेक्षा उत्तर भारतीय चांगली मराठी भाषा बोलतात


मराठीची सक्ती करायची असेल तर मदरशांमध्येही करा


मुंबई : हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू मराठीच्या नावावर राजकारण करत आहेत. आदित्य आणि अमित ठाकरे यांना जेवढी मराठी बोलता येत नाही, त्यापेक्षा अधिक चांगली मराठी आपल्या उत्तर भारतीय हिंदू बांधव आणि त्यांची मुले बोलतात. मराठी सक्ती गरीब उत्तर भारतीय लोकांवरच का केली जाते असा सवाल करत मराठीची सक्ती करायचीच असेल, तर मग ती मदरशांमध्येही व्हायला पाहिजे, मदरशांमध्येही मराठी भाषा शिकवली पाहिजे सांगत मत्सव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्याचा समाचार घेतला. ठाकरे बंधूंना मत म्हणजे पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या अब्बाला मत असेही त्यांनी यावेळी सांगितले.


गोरेगाव गोकूळधाममधील भाजप -शिवसेना महायुतीच्या उमेदवार प्रीती सातम यांच्या प्रचारासाठी गोरेगाव पूर्व येथील कन्यापाडा येथील चौकसभेत ते बोलत होते. कन्यापाडा परिसरात त्यांचे स्वागत 'जय श्री राम' घोषणांनी झाले. कन्यापाडा ते व्यासपीठापर्यंतचा परिसर जय जय श्रीरामाच्या नामघोषांनी दणाणून गेला होता.


हे हिंदू राष्ट्र, हिंदुत्व विचारधारेचे राष्ट्र आहे, हा महाराष्ट्र, ही मुंबई हिंदुत्वाच्या विचारधारेची आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आपल्या हिंदू समाजाचे आहेत, त्यामुळे हिंदू समाजाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदूंकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यात आमची पीएचडी झालेली आहे. या हिंदू राज्यात, हिंदू समाजाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही खपवून घेणार नाही, असे राणे म्हणाले. निवडणूक असो वा नसो, काही चुकीचा त्रास जर आमच्या हिंदूंना देणार असाल, तर जसे आज निवडणुकीसाठी मत मागायला आलो आहे, तसेच पुढील वेळेला सांगणारही नाही आणि अशा जागेवर येईन की शुक्रवारचाही त्रास होईल. हा सर्व प्रकार माझ्या ५२ वॉर्डांत करण्याची हिंमत करू नका. ही आमची सातम बहीण एकटी नाही, तिच्या मागे आम्ही आहोत, हे आज मी इथून सांगून जात आहे. आपल्याला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. आज निवडणूक असू द्या किंवा नसू द्या आपल्याला हिंदू बनून जे करायचे ते करा, जो सण आपल्याला करायचा तो जोरात साजरा करा. हे आज मी आपल्याला सांगून जात आहे. आमच्या या मुंबईमध्ये फक्त आय लव्ह महादेव म्हणणारेच राहू शकतात. बाकी कुणालाच इथे जागा नाही, असेही नितेश राणे यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे कुणाला घाबरवणे, धमकावणे अशा प्रकारची मस्ती यापुढे इथे चालणार नाही. १६ तारखेनंतर जो हिशोब करायचा असेल तो आम्ही चुकता करणार. जे हिंदू समाज मला ऐकत आहेत त्यांनी आता कोणत्याही प्रकारचा भीती बाळगायची गरज नाही, असा विश्वासही नितेश राणे यांनी जनतेला दिला.

Comments
Add Comment

MahaDBT Students Scheme : मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये मिळणार; कोण पात्र? जाणून घ्या

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण (Higher Education) घेणे अनेक

Goregaon-Mulund Link Road (GMLR) : दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत होणार खुले?

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Iran-Hezbollah Attack on Israel : इस्रायलवर एकाच वेळी दोन बाजूंनी हल्ला; इराणचा थेट इशारा, 'प्रत्युत्तर दिल्यास विध्वंस अटळ'

Iran-Hezbollah Attack on Israel : मध्य पूर्वेतील (Middle East) परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनली आहे. लेबनॉनवरील (Lebanon) इस्रायली हल्ल्यांच्या

Buldhana 'Fake Murder Case' : राजुर 'फेक मर्डर केस' गाजली; तपासातील हलगर्जीपणामुळे दोन PI निलंबित

बुलढाणा : राज्यभर चर्चेत असलेल्या जळगाव जामोद येथील कथित बनावट हत्याकांड (Fake Murder Case) प्रकरणात तपासातील गंभीर

NCP Rajendra Jain : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी; 'पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार', राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा (Rajya Sabha) जागेसाठी राष्ट्रवादी