राज ठाकरे यांना अजूनही काही नेते सोडून जाण्याची भीती, जाहीर सभेत बोलून दाखवले हे शब्द..

 




मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी पुढे कोण सोबत राहील आणि कोण सोडून जाईल याची भीती त्यांना आजही सतावत आहेत. आज मनसे आणि उबाठा यांची युती झाल्याने अनेक नाराज झाले आणि पक्ष सोडून गेले. त्या पक्ष सोडून गेलेल्यांची राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपलेच आहेत,परत येतील, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी आता जे आहेत ते कुठे जातील ते माहित नाही, असे सांगत भविष्यात सोबत असणारेही सोडून जातील अशीच अप्रत्यक्ष भीती व्यक्त केली.


उबाठा, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई महापालिका निवडणुकीची जाहीर सभा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावर आवाज उठवल्याबद्दल अनेक सामाजिक संस्था आहे, त्यांचे नेते. वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र यांचे संपादक तसेच पत्रकार यांचे आभार मानले. २० वर्षानंतर प्रथमच मी युती करतो. युतीच्या प्रोसेसमध्ये अनेकांची मने दुखावली गेली. अनेक नाराज झाले, काहींना वाईट वाटले ते दुसऱ्या पक्षात गेले. पण आमच्याही हातात नसतात या गोष्टी. त्यांना दुखावणे हा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे मी त्याची, दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत त्यांनी एकप्रकारे माफी मागितली. जे सोडून गेले ते आपलेच आहेत. परत येतील. आता आहेत ते कुठे जातील तेही माहित नाही, त्यांना समजू शकतो,असे सांगत एकप्रकारे राज ठाकरे यांनी भिती व्यक्त केली.

मागील काही दिवसात, स्नेहल जाधव,राजा चौगुले, संतोष धुरी, संतोष नलावडे, ढवळे, आदी पक्ष सोडून गेले असून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हेही नाराज असून तेही पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच जाहीर सभेत देशपांडे यांना भाषण करण्याची संधी दिली. आणि देशपांडे व्यासपीठावर असताना राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे देशपांडे यांनाच उद्देशून अप्रत्यक्ष तर बोलले नाही ना असा प्रश्न मनसैनिक आणि उबाठाच्या शिवसैनिकांना पडला आहे.
Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

Kashi Vishwanath Vedic Clock : टिक-टिक नव्हे, आता मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री!

वाराणसी : उत्तर प्रदेशातील जगप्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwnath Temple) आता केवळ अध्यात्माचेच नव्हे, तर भारताच्या

Iran-US-Israel War : युद्ध आणखी पेटणार? इस्रायलने दिला मोठा इशारा; सौदी-बहरैन पूल बंद

मध्य पूर्व आशियामधील युद्ध (Iran-US-Israel War) आता सहाव्या आठवड्यात पोहोचले असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे.

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट ; IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा

नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू