मुंबई मनपा निवडणूक, भाजपाचा वाढता दबदबा, ठाकरे बंधूंची लागणार कसोटी

मुंबई : मुंबईत महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी यावेळी राजकीय लढत अधिक तीव्र झाली आहे. एका बाजूला भाजप आणि महायुती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती,असा थेट सामना रंगणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील राजकीय उलथापालथ पाहता, ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.


मुंबई मनपेसाठी अवघ्या काही दिवसांत मतदान पार पडणार असून १५ जानेवारीला मतदार मतदानाचा हक्क बजावतील, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. २२७ वॉर्डांमध्ये तब्बल १७००हून अधिक उमेदवार रिंगणात उतरले असले, तरी खरी राजकीय लढाई भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशीच पाहिली जात आहे.



राजकीय गणित बदलले, समीकरणं उलटली


२०१७ च्या मनपा निवडणुकीत शिवसेना (तेव्हाची एकसंध) आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. शिवसेनेने ८४ तर भाजपाने ८२ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसलाही फूट पडली आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचा गट प्रथमच स्वतंत्र ताकदीने मुंबई मनपाची निवडणूक लढवत आहे.


आपली संघटनात्मक ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही, याची जाणीव असल्याने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी मनसेशी युती केली. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने मराठी अस्मिता, भावनिक मुद्दे आणि मुंबईवरील हक्क यावर भर दिला जात आहे.



भाजपाचा विकासाचा अजेंडा


दुसरीकडे भाजप आणि महायुतीने निवडणूक प्रचारात थेट विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. मुंबईला ग्लोबल सिटी बनवण्याचा संकल्प, भक्कम इन्फ्रास्ट्रक्चर, सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारी घरं, आरोग्यसेवेचा विस्तार आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची आश्वासने भाजपाच्या वचननाम्यात आहेत. त्यामुळे भावनिक मुद्दे विरुद्ध विकास असा स्पष्ट राजकीय संघर्ष यावेळी पाहायला मिळतोय.



आकडे काय सांगतात?


मुंबई मनपाच्या मागील निवडणुकांचा आढावा घेतला, तर भाजपाची ताकद सातत्याने वाढताना दिसते.


२००७ मध्ये भाजप केवळ २८ जागांवर होती
२०१२ मध्ये हा आकडा ३१ वर गेला
२०१७ मध्ये भाजप थेट ८२ जागांपर्यंत पोहोचली


याउलट शिवसेनेची (उबाठा) ताकद स्थिर राहिली, तर आता पक्षफुटीनंतर ती अधिकच कमकुवत झाली आहे. मनसेने २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये २७ जागा जिंकल्या होत्या, मात्र २०१७ मध्ये पुन्हा घसरण होत केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे उबाठा–मनसे युती २०२६ मध्ये किती प्रभावी ठरणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.



निकाल ठरवणार महाराष्ट्राची दिशा?


मुंबई महानगरपालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही. ही निवडणूक अस्मितेची, वर्चस्वाची आणि राजकीय भवितव्याची आहे. ठाकरे बंधू भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखू शकतील का, की मुंबईत भाजप आपली सत्ता अधिक मजबूत करणाऱ्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नसून, तो महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ