मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) शहरातील विविध भागांत विशेष मोहीम राबवत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याच्या संशयावरून 37 बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने दहिसर, कांदिवली, मालाड, कुर्ला, टिळक नगर आणि मानखुर्द या परिसरांमध्ये छापेमारी केली. संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही मोहीम राबवली. प्राथमिक तपासात काही व्यक्ती भारतात आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवेश करून राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Crime)
नवी दिल्ली : ई-20 पेट्रोलबाबत (E20 Petrol) सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ई-20 पेट्रोलमुळे वाहनांचे ...
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या ओळखीची आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आधार कार्ड, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांची सत्यता तपासली जात असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे. (Mumbai Police)
तपासादरम्यान काही जणांनी पश्चिम बंगाल सीमेमार्गे भारतात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही घुसखोरांनी आसाम सीमेलाही प्रवेशासाठी वापरल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांचा आणि संभाव्य नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
नवी दिल्ली : तब्बल २३ दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारणा चळवळीचे प्रमुख सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी अखेर सोमवारी ...
गुन्हे शाखा या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, भारतात बेकायदेशीर प्रवेश करण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली, त्यामागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे संबंधितांविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Illegal Immigrants)
मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा वेळोवेळी विशेष मोहिमा राबवत असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.