Mumbai Crime Branch : मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बेकायदेशीर वास्तव्याच्या संशयावरून 37 बांगलादेशी नागरिक ताब्यात

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) शहरातील विविध भागांत विशेष मोहीम राबवत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याच्या संशयावरून 37 बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर स्थलांतराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


गुन्हे शाखेच्या पथकाने दहिसर, कांदिवली, मालाड, कुर्ला, टिळक नगर आणि मानखुर्द या परिसरांमध्ये छापेमारी केली. संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही मोहीम राबवली. प्राथमिक तपासात काही व्यक्ती भारतात आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवेश करून राहत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Crime)



अधिकाऱ्यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या ओळखीची आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आधार कार्ड, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांची सत्यता तपासली जात असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे. (Mumbai Police)


तपासादरम्यान काही जणांनी पश्चिम बंगाल सीमेमार्गे भारतात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही घुसखोरांनी आसाम सीमेलाही प्रवेशासाठी वापरल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांचा आणि संभाव्य नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.



गुन्हे शाखा या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, भारतात बेकायदेशीर प्रवेश करण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली, त्यामागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे संबंधितांविरोधात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Illegal Immigrants)


मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा वेळोवेळी विशेष मोहिमा राबवत असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ