मराठी माध्यमच्या पोरांनी गाजवले थिएटर्स’! क्रांतीज्योती विद्यालय ११ दिवसांत १० कोटींच्या पार

मुंबई : मराठी सिनेविश्वासाठी नववर्षाची सुरुवात जल्लोषाची ठरली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार मुसंडी मारत अवघ्या ११ दिवसांत १० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मराठी शाळा, मातृभाषा आणि शिक्षणपद्धतीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.


१ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यापासूनच चांगली कमाई केली. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचा वेग अधिक वाढताना दिसतोय. सुट्ट्या आणि वीकेंडचा पुरेपूर फायदा या चित्रपटाला झाला आहे.



कमाईचे आकडे


पहिल्या आठवड्यातील कमाई – ५.७५ कोटी रुपये
१० वा दिवस (शनिवार) – १.६५ कोटी रुपये
११ वा दिवस (रविवार) – २.१ कोटी रुपये


एकूण नेट कलेक्शन – १०.१ कोटी रुपये
जागतिक कमाई – अंदाजे १२ कोटी रुपये


मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक शहरांमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल जात आहेत. विशेष म्हणजे केवळ मराठी माध्यमातील विद्यार्थीच नाही, तर इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले आणि पालकही मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहत आहेत.



अभिनयाचं विशेष कौतुक


सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही भरभरून कौतुक होत आहे. भावनिक आशय, वास्तवदर्शी मांडणी आणि प्रभावी संवाद यामुळे सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडतोय.



कमी बजेट, मोठा नफा


या चित्रपटाचं बजेट साधारणतः २ ते ३ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्या तुलनेत आतापर्यंत झालेली कमाई पाहता, सिनेमाने आपल्या बजेटच्या तब्बल पाचपट अधिक उत्पन्न मिळवलं आहे. चित्रपट विश्लेषकांच्या मते, येत्या काही दिवसांतच ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १५ कोटींचा आकडा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला