टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल अखेर आपले मौन सोडले आहे. या निर्णयावर त्याने एक तात्त्विक भूमिका घेतली असून, निवड समितीच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला वडोदरा येथे पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाला, "मी जिथे असायला हवं, बरोबर तिथेच आहे."


भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल एकेकाळी टी-२० संघाचा उपकर्णधार होता. सूर्यकुमार यादवनंतर आता गिल टी-२० संघासह तीनही फॉरमॅटचा कर्णधार होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र भारतात अवघ्या काही महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा भारतीय संघ जाहीर झाला आणि शुभमन गिलसह सर्वांनाच धक्का बसला. १५ सदस्यांच्या संघात उपकर्णधार शुभमन गिललाच डच्चू देण्यात आला होता. उपकर्णधारपदावरून गिलला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्या टीम सिलेक्शनवर अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले. संघ जाहीर झाला त्यावेळी गिल काही बोलला नव्हता. मात्र आता वन-डे मालिकेपूर्वी कर्णधार म्हणून प्रेस पत्रकारांशी बोलताना त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने टी-२० संघातून वगळ्याबद्दल त्याची काय भावना आहे याबाबत वक्त झाला. शुभमन गिलने निवडसमिती बाबत देखील आपले मत मांडले. त्यानं कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करत निवडसमितीचा निर्णय मान्य केला. तो म्हणाला, मी निवडसमितीच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो. मी टी-२० संघाला शुभेच्छा देतो. मला आशा आहे के वर्ल्डकप जिंकतील.' त्याचप्रमाणे गिलचे लक्ष आता फक्त संघावर आहे.

Comments
Add Comment

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

RR : राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील

IPL 2026 : प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा!

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब आययपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील ६१ वा सामना