Pune News :पुण्यातील रस्ते केले साफ,पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. नक्की काय होणार ?

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील स्वच्छ झाल्याचे पहायला मिळत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण ? एका आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे पुण्यात अवघ्या ७५ दिवसांत तब्बल ३०० किलोमीटर रस्त्यांचं काम पूर्ण करण्यात आलं असून हे रस्ते आता चकाचक झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) हे काम उच्च दर्जाच्या मानकांनुसार पूर्ण केल्याने सध्या पुणेकरांमध्ये याची जोरदार चर्चा आहे.

या मागच कारण असं की ,पुण्यात लवकरच पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा पहिल्यांदाच पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भागात होणार आहे. जगभरातील ३५ देशामधील १३१ नामांकित सायकलपटू यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या मार्गासाठी पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, मावळ आणि हवेली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निकषांनुसार रस्त्यांची गुणवत्ता राखण्यासाठी सिमेंट बेस ट्रिटमेंट (CBT) पद्धतीचा वापर करून रस्त्यांचा पाया मजबूत करण्यात आला आहे. त्यानंतर दर्जेदार डांबरीकरण केल्यामुळे हे रस्ते पुढील किमान पाच वर्षे टिकाऊ राहतील, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत सुमारे १०० किलोमीटर रस्त्यांचं रुंदीकरणही करण्यात आलं आहे.

या संपूर्ण रस्ते प्रकल्पासाठी पीएमआरडीए, जिल्हा नियोजन समिती आणि राज्य सरकारच्या मदतीने सुमारे २९४ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधणी पूर्ण होणं ही बाब विशेष मानली जात आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे जरी हे काम वेगात झालं असलं, तरी पुणेकरांना आता अपेक्षा आहे की, अशीच गुणवत्ता आणि गती भविष्यातील सर्व रस्ते कामांमध्येही कायम राहावी. पुणे ग्रँड टूरमुळे केवळ क्रीडाक्षेत्रालाच नव्हे, तर शहराच्या पायाभूत सुविधांनाही मोठी चालना मिळाल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार