'सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून मुंबईमध्ये जय श्रीराम म्हणता येणार नाही'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवडी येथील वॉर्ड क्रमांक २०५ मध्ये भाजपा-महायुतीच्या उमेदवार सौ.वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आज शिवडी रामटेकडी येथे चौकसभा पार पडली.


शिवडी आणि लालबाग हा हिंदुत्वाचा गड आहे. इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या भायखळ्यात गेल्यावर "जय श्रीराम" म्हणता येतं का ? आपण सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून आपल्या हक्काच्या मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला जय श्रीराम म्हणता येणार नाही.


अनेक वर्षे ठाकरे बंधूंची मुंबई पालिकेत सत्ता असताना या भागातील मराठी माणूस बाहेर का गेला ? हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. इथे मराठी माणूस टिकायलाच पाहिजे, मराठी सण-उत्सव हक्काने साजरे झालेच पाहिजेत. त्यामुळे मुंबईमध्ये हिंदुत्व आणि अस्मिता जपायची असेल तर शिवडी, लालबाग, परळ, काळाचौकीतील प्रत्येक हिंदूने आपल्या अस्तित्वासाठी १५ तारखेला मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर येऊन हिंदुत्ववादी विचारांचे नगरसेवक निवडून दिले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी राजेश हाटले, बबन कनावजे, गणेश शिंदे यांसह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची