'सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून मुंबईमध्ये जय श्रीराम म्हणता येणार नाही'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवडी येथील वॉर्ड क्रमांक २०५ मध्ये भाजपा-महायुतीच्या उमेदवार सौ.वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आज शिवडी रामटेकडी येथे चौकसभा पार पडली.


शिवडी आणि लालबाग हा हिंदुत्वाचा गड आहे. इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या भायखळ्यात गेल्यावर "जय श्रीराम" म्हणता येतं का ? आपण सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून आपल्या हक्काच्या मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला जय श्रीराम म्हणता येणार नाही.


अनेक वर्षे ठाकरे बंधूंची मुंबई पालिकेत सत्ता असताना या भागातील मराठी माणूस बाहेर का गेला ? हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. इथे मराठी माणूस टिकायलाच पाहिजे, मराठी सण-उत्सव हक्काने साजरे झालेच पाहिजेत. त्यामुळे मुंबईमध्ये हिंदुत्व आणि अस्मिता जपायची असेल तर शिवडी, लालबाग, परळ, काळाचौकीतील प्रत्येक हिंदूने आपल्या अस्तित्वासाठी १५ तारखेला मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर येऊन हिंदुत्ववादी विचारांचे नगरसेवक निवडून दिले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी राजेश हाटले, बबन कनावजे, गणेश शिंदे यांसह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Add Comment

राज ठाकरे यांना अजूनही काही नेते सोडून जाण्याची भीती, जाहीर सभेत बोलून दाखवले हे शब्द..

  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी पुढे कोण सोबत राहील आणि

बडोद्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 'विराट' विजय

बडोदा : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त

शिवसेना–भाजप–रिपाईला बहुमत द्या, महापालिकेवर भगवा फडकवा

मुंबईचा थांबलेला विकास पुन्हा सुरू; घर, रस्ते आणि योजनांवर शिंदेंचा ठाम भर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका कायम; २३ आठवडे सलग दरवाढ, चिकन-भात सामान्यांच्या आवाक्याबाहेर

कराची : पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारण्याची कोणतीही ठोस चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय

'जैश - ए - मोहम्मद'चा म्होरक्या महसूर अजहरचा ऑडिओ व्हायरल; सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली

इस्लामाबाद : भारतविरोधी आक्रमक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हालचाली