मुंबईत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहरे मैदानात

भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही


मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता टिपेला पोहोचला असून मराठी आणि हिंदुत्व यावरून प्रचाराचे लोळ उडताना पहायला मिळत आहे. मात्र, हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. याउलट मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एरव्ही समाजवादी पक्ष आणि एमआयएम यासह काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवाराला संधी देण्यात येत असली तरी भाजपने यंदाही एकाही उमेदवाराला संधी देत आपली हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संधी देत त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपकडून हिंदुत्वाचा पुरस्कार केला जात असल्याने भाजपाकडून मुस्लिमांना किती संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, भाजपने यंदा एकाही मुस्लीम उमेदवाराला संधी दिलेली नाही. या उलट उबाठा आणि शिवसेनेने प्रत्येकी ०९ मुस्लीम उमेदवाराला संधी दिली आहे. तर काँग्रेस पक्षाच्यावतीने ३३ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.


समाजवादी पक्ष आणि एमआयएम हे पक्ष मुस्लिमांचे असल्याने या पक्षाकडून मुस्लीम उमेदवारांना सर्वाधिक उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारीची चर्चा नसली तरी त्याखालोखाल काँग्रेस पक्षाकडून मुस्लिमांना उमेदवारी दिली जाते.


कोणत्या पक्षात मुस्लीम उमेदवार किती?




  • भाजप : ००

  • काँग्रेस : ३३

  • राष्ट्रवादी काँग्रेस : ११

  • शिवसेना : ०९

  • उबाठा ०९

  • वंचित : ००

  • मनसे : ०२

  • राष्ट्रवादी काँग्रेस शप ०२

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र