CSMT Station : "आता रेल्वे प्रवासापूर्वी होणार विमानतळासारखी झडती! CSMT स्थानकात प्रवेशाचे नियम बदलले; पाहा काय आहे अट

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील सुरक्षा यंत्रणा आता अधिक कडक करण्यात आली आहे. मेल आणि एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बॅगेज स्कॅनिंग (सामानाची तपासणी) बंधनकारक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने उचललेले हे पाऊल विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेची आठवण करून देणारे आहे. रेल्वे प्रशासनाने लागू केलेल्या नवीन नियमानुसार, स्थानकात प्रवेश करताना सुरक्षा अधिकारी बॅगेज स्कॅनरद्वारे प्रत्येक बॅगेची बारकाईने तपासणी करतील. ज्या बॅगांची तपासणी पूर्ण होईल, त्यावर विशेष 'स्टिकर' लावले जाणार आहे. ज्या प्रवाशांच्या सामानावर हे स्टिकर नसेल, त्यांना टर्मिनसमध्ये प्रवेश नाकारला जाईल. यामुळे प्रवाशांना आता प्रवासाच्या वेळेपूर्वी थोडे लवकर स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. देशातील एक महत्त्वाचे टर्मिनस असूनही सीएसएमटीवर प्रवाशांच्या सामानाची नियमित तपासणी होत नसल्याची बाब अनेकदा समोर आली होती. सुरक्षेच्या या गंभीर त्रुटींकडे प्रसारमाध्यमांनी वारंवार लक्ष वेधले होते. अखेर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत मुख्य प्रवेशद्वारावर दोन अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर बसवले असून सुरक्षेचा ताफाही तैनात केला आहे. सीएसएमटीवरून दररोज शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात आणि लाखो प्रवासी येथून प्रवास करतात. यापूर्वी सुरक्षा उपाय अपुरे असल्याने प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण असायचे. मात्र, आता सुरू झालेल्या या सक्तीच्या तपासणीमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



तिकीट खिडकी ते प्लॅटफॉर्मपर्यंत कडेकोट बंदोबस्त...


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी आता 'नो स्कॅनिंग, नो एन्ट्री' हे धोरण राबवले जात आहे. स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने लोकल प्लॅटफॉर्म आणि तिकीट काउंटरकडून एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावले आहेत. प्रवाशांची बॅग स्कॅनरमधून गेल्याशिवाय त्यांना प्लॅटफॉर्मवर पाऊलही ठेवता येणार नाही. प्रवाशांच्या सामानात कपड्यांव्यतिरिक्त कोणतीही ज्वालाग्राही, घातक किंवा संशयास्पद वस्तू तर नाही ना, याची खात्री सुरक्षा दलाचे जवान करणार आहेत. केवळ प्रवाशांच्या बॅगाच नाही, तर स्थानकावरील क्लॉक रूममध्ये (सामानाचे घर) ठेवण्यात येणाऱ्या सामानाचीही कडक तपासणी केली जात आहे. यामुळे स्थानक परिसरात कोणतीही बेवारस किंवा धोकादायक वस्तू राहण्याची शक्यता संपुष्टात येईल. 'स्टिकर पद्धती'मुळे तपासणी झालेलं सामान लांबूनच ओळखता येणार असल्याने सुरक्षा यंत्रणेचा ताणही कमी होणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, ही सुरक्षा यंत्णा केवळ सुरुवात आहे. सीएसएमटीवरील या प्रयोगाच्या यशानंतर मुंबईतील इतर महत्त्वाच्या रेल्वे टर्मिनसवरही अशाच प्रकारे उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था लागू केली जाईल. यामुळे मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.

Comments
Add Comment

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी

मुंबईत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहरे मैदानात

भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता

मतदानाच्या दिवशी सुट्टी नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

तपासणीसाठी पालिकेच्यावतीने दक्षता पथकांची स्थापना मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६

'धारावीचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही'

कुंभारवाड्यासह सर्व कुटीर उद्योगांना पाच वर्षे असेल कर माफ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला