Himachal Bus Accident : हिमाचलमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बस ६० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

नाहन : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक खासगी बस रस्ता सोडून सुमारे ६० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?



 

मिळालेल्या माहितीनुसार, 'जीत कोच' नावाची ही खासगी बस शिमला येथून कुपवीकडे जात होती. सिरमौर जिल्ह्यातील रेणुकाजी विधानसभा क्षेत्रातील हरिपुरधारजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावरून खाली घसरली आणि खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी प्रवाशांचा मोठा आक्रोश ऐकायला मिळत होता. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, जखमींना हरिपुरधार येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. या रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा नसल्यामुळे स्थानिकांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. सुक्खू सरकारने या रुग्णालयाचा दर्जा कमी (डिनोटिफाई) केल्यामुळे उपचारात अडथळे येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेणुकाजीचे आमदार विनय कुमार आणि एसपी निश्चित सिंह नेगी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्रींनी व्यक्त केला शोक


स्थानिकांचे धाडसी बचावकार्य अपघात होताच हरिपुरधार बाजारपेठेतील स्थानिक नागरिकांनी तातडीने दरीच्या दिशेने धाव घेतली. बस पूर्णपणे चक्काचूर झाल्यामुळे जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने हरिपुरधार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवासी संख्या जास्त असल्याने जखमींचा आकडा मोठा असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "सोलनहून हरिपुरधारला जाणाऱ्या खासगी बसचा झालेला हा अपघात अत्यंत वेदनादायक आहे. या भीषण दुर्घटनेत जीव गमावलेल्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना." या अपघातामुळे संपूर्ण सिरमौर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या