मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या निर्णयानुसार ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांपर्यंत मंदिरात थेट दर्शन करता येणार नाही.


मंदिर परिसरातील सभामंडप, पायऱ्यांचा मार्ग, तसेच भाविकांच्या सुरक्षित प्रवेश-निर्गमनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही सर्व कामे सुरळीत आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



महाशिवरात्रीला दर्शन सुरू राहणार


तात्पुरत्या बंदीच्या कालावधीत महाशिवरात्रीचा कालावधी वगळण्यात आला असून, १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या काळात भाविकांसाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीत मंदिर परिसरात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.



सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने तयारी


जिल्हा प्रशासन, देवस्थानचे विश्वस्त, स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्यात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मंदिर बंद ठेवून पायाभूत सुविधांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विकासकामांदरम्यान गर्दी टाळणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आवश्यक सुविधा उभारून ठेवण्यासाठी सध्या कामे हाती घेण्यात आली आहेत.



पूजा विधी नियमित, मात्र प्रवेश बंद


मंदिर बंद असले तरी श्री भीमाशंकराची दैनंदिन पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. मात्र कोणत्याही भाविकाला थेट दर्शन किंवा मंदिर परिसरात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.



जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भाविकांना संयम ठेवण्याचे आवाहन करत, विकासकामांसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे