मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या निर्णयानुसार ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांपर्यंत मंदिरात थेट दर्शन करता येणार नाही.


मंदिर परिसरातील सभामंडप, पायऱ्यांचा मार्ग, तसेच भाविकांच्या सुरक्षित प्रवेश-निर्गमनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही सर्व कामे सुरळीत आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



महाशिवरात्रीला दर्शन सुरू राहणार


तात्पुरत्या बंदीच्या कालावधीत महाशिवरात्रीचा कालावधी वगळण्यात आला असून, १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या काळात भाविकांसाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीत मंदिर परिसरात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.



सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने तयारी


जिल्हा प्रशासन, देवस्थानचे विश्वस्त, स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्यात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मंदिर बंद ठेवून पायाभूत सुविधांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विकासकामांदरम्यान गर्दी टाळणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आवश्यक सुविधा उभारून ठेवण्यासाठी सध्या कामे हाती घेण्यात आली आहेत.



पूजा विधी नियमित, मात्र प्रवेश बंद


मंदिर बंद असले तरी श्री भीमाशंकराची दैनंदिन पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. मात्र कोणत्याही भाविकाला थेट दर्शन किंवा मंदिर परिसरात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.



जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भाविकांना संयम ठेवण्याचे आवाहन करत, विकासकामांसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

साखरपुड्यानंतर ४ दिवसांत जोडप्याचा दुर्दैवी अंत; धाराशिवमध्ये कारचा भीषण अपघात

धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील

राज्यात 'लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी' कायदा तात्काळ करण्याच्या मागणीला जोर

- हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने मुंबई : गेल्या दोन

चेन्नईत बीचवर अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, मुख्यमंत्री तामिळनाडू सरकारच्या संपर्कात

मुंबई : चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत

Solapur Crime: हातावर सुसाईट नोट लिहत विवाहितेने संपवलं आयुष्य; सोलापुरातील नातेपुते शहरातील हृदयद्रावक घटना

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे एका विवाहितेने आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या केल्याने खळबळ

आता… ‘गाव तिथे एसटी’ नव्हे... ‘आदिवासी पाडा, तिथे एसटी’! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता

Mumbai-Nashik Local Train: मुंबई-नाशिक लोकलसेवा सुरु होणार; रेल्वे मार्गाच्या विस्ताराला मंजुरी

मुंबई: मुंबई आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. मुंबईच्या