Nitesh Rane : वसई-विरारमध्ये नितेश राणेंची तोफ! वसई-विरारचा विकास फक्त भाजपच करू शकते मंत्री नितेश राणेंचं आश्वासन

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज नालासोपारा (पूर्व) येथील अचोळे संकेश्वर नगर परिसरात भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली आणि सभा पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक १५ आणि २१ मधील उमेदवारांसाठी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.





रॅलीला जनसागराचा प्रतिसाद



नितेश राणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. "येणाऱ्या १५ जानेवारीला केवळ मतदान करायचे नाही, तर वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला विजयी करायचे आहे," असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. नालासोपाऱ्यातील रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून त्यांनी स्थानिक विरोधकांवर निशाणा साधला.



विकासाचे व्हिजन आणि हिंदुत्वाचा हुंकार


सभेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की, "वसई-विरारला गुंडगिरी आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करून खऱ्या अर्थाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. प्रभाग १५ आणि २१ मधील आमचे उमेदवार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत." यावेळी त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही उपस्थितांमध्ये उत्साह भरला. यावेळी व्यासपीठावर स्थानिक भाजप पदाधिकारी, महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नितेश राणे यांच्या या झंझावती दौऱ्यामुळे नालासोपाऱ्यातील निवडणुकीत भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

Meta आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार ?

- एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचारी संरचनेत बदल मेटा प्लॅटफॉर्म ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या

"काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नाही"; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

- सततच्या पराभवातून आलेल्या नैराश्यातूनच काँग्रेसचा देशाविरोधात मोर्चा आसाम सोबतच देशातील बहुतेक

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ