जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असतानाच महापालिकेचा नवीन महापौर कोण होणार, याबाबतचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कारण महापौरपदासाठीचे आरक्षण अजूनही जाहीर झालेले नसून या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिला की सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौरपद राखीव होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने इच्छुकांची धडधड वाढली आहे. महापालिकेचा पुढील कारभार कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. १६ जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. तर १३ ला सायंकाळी पाचपर्यंत प्रचाराची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांना अवघे आठ दिवस मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळाले आहेत.
Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Pune Autorickshaw Fare Hike : पुणेकरांना महागाईचा झटका : १ सप्टेंबरपासून ऑटो रिक्षा प्रवास महागणार; RTA कडून नव्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात ऑटो रिक्षाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या खिशाला जास्तीची कात्री

Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :