धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली चिमुकली मुले आणि कुटुंबीयांनी म्हातारी माणसे गमावली आहेत. त्यामुळे गावांमध्ये बिबट्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


अशीच काहीशी घटना सांगली जिल्ह्यातील उपवळे गावात बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री घडली. घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ९ वर्षीय चिमुकलीवर झडप घालत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून तिच्या ११ वर्षांच्या भावाने धाडस दाखवत बहिणीचा जीव वाचवला. या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मुलाच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



नेमकं काय घडलं?


उपवळे गावातील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे घर आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर शिवम आणि स्वरांजली पाटील हे भाऊ-बहीण एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते. त्याच वेळी घरांच्या मधील मोकळ्या जागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला चढवत तिची मान पकडली.


क्षणाचाही विलंब न करता शिवमने प्रसंगावधान राखत बहिणीचा पाय पकडला आणि तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने दोघांना काही अंतर फरफटत नेले, मात्र शिवमने बहिणीचा पाय सोडला नाही. याच दरम्यान मुलांच्या आईने जोरात आरडाओरडा केला. आवाज आणि लोकांची गर्दी वाढताच बिबट्याने अखेर मुलीला सोडून पळ काढला.



स्वेटर आणि टोपी ठरली संरक्षणाची ढाल


स्वरांजलीने स्वेटर व डोक्यावर टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात थेट मानेत रुतले नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र तिच्या मान, हात आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. दोन्ही मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.


अवघ्या ११ वर्षांच्या शिवम पाटीलने दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला. जीव धोक्यात घालून बहिणीला वाचवणाऱ्या या चिमुकल्या वीराचे गावासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र