धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली चिमुकली मुले आणि कुटुंबीयांनी म्हातारी माणसे गमावली आहेत. त्यामुळे गावांमध्ये बिबट्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


अशीच काहीशी घटना सांगली जिल्ह्यातील उपवळे गावात बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री घडली. घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ९ वर्षीय चिमुकलीवर झडप घालत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून तिच्या ११ वर्षांच्या भावाने धाडस दाखवत बहिणीचा जीव वाचवला. या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मुलाच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



नेमकं काय घडलं?


उपवळे गावातील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे घर आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर शिवम आणि स्वरांजली पाटील हे भाऊ-बहीण एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते. त्याच वेळी घरांच्या मधील मोकळ्या जागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला चढवत तिची मान पकडली.


क्षणाचाही विलंब न करता शिवमने प्रसंगावधान राखत बहिणीचा पाय पकडला आणि तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने दोघांना काही अंतर फरफटत नेले, मात्र शिवमने बहिणीचा पाय सोडला नाही. याच दरम्यान मुलांच्या आईने जोरात आरडाओरडा केला. आवाज आणि लोकांची गर्दी वाढताच बिबट्याने अखेर मुलीला सोडून पळ काढला.



स्वेटर आणि टोपी ठरली संरक्षणाची ढाल


स्वरांजलीने स्वेटर व डोक्यावर टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात थेट मानेत रुतले नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र तिच्या मान, हात आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. दोन्ही मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.


अवघ्या ११ वर्षांच्या शिवम पाटीलने दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला. जीव धोक्यात घालून बहिणीला वाचवणाऱ्या या चिमुकल्या वीराचे गावासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे