ठाण्यात ११४ उमेदवार अब्जाधीश !

ठाणे : येत्या १५ जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी तब्बल ६४९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रांच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली असून यापैकी ११४ उमेदवार हे अब्जाधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या श्रीमंत उमेदवारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.


मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या परिषा प्रताप सरनाईक (वॉर्ड ५ क, ठाणे) यांनी आपल्या शपथपत्रात तब्बल ३८१ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची नोंद केली आहे. त्यांच्यानंतर बाबाजी पाटील (वॉर्ड २९ क, मुंब्रा) यांची १२६ कोटी रुपयांची मालमत्ता असून कळव्यातील मंदार केणी (वॉर्ड २३ ड) यांच्याकडे १०५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर झाले आहे.


कोट्यधीश उमेदवारांमध्येही विविध पक्षांचे प्रतिनिधी आहेत. शिवसेनेचे हणमंत जगदाळे (६३.४४ कोटी) आणि मनाली पाटील (६१.६८ कोटी), भाजपच्या प्रतिभा मढवी (४३.५७ कोटी) व नंदा कृष्णा पाटील (५१.२० कोटी), ठाकरे गटाच्या नंदिनी विचारे (४१.८७ कोटी), महेश्वरी तरे (२३.४४ कोटी) व कविता पाटील (५५.८२ कोटी), मनसेच्या रेश्मा पवार (१७.७८ कोटी) तसेच अपक्ष प्रमिला केणी (६१.६८ कोटी) यांचासमावेश आहे.


याउलट, ठाणे महापालिका निवडणुकीतील सर्वात कमी उत्पन्न असलेले उमेदवार मुंब्रा भागातील असून एका उमेदवाराने अवघे २० हजार ५०२ रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवले आहे. आता मतदार कोणाला पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविकेची २४ तासांत भाजपमध्ये घरवापसी

मीरा-भाईंदर : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या मीरा रोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी

कल्याणमध्ये उबाठाला मोठा झटका

अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम

खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून

राबोडीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने

जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारावेळी अजित पवार गटाचे शक्तिप्रदर्शन ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरात बुधवारी

कुणाच्याही भूलथापांना, दबावाला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन नवी मुंबई : कुणाच्याही भुलथापा वा दबावाला बळी पडण्याचे कोणतेही कारण नाही.