KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित लिपिक निलंबित करण्यात आले असून महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.



धमकी देत शरीर सुखाची मागणी


मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एका कामावरून भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. यावेळी पाटील याने सर्वासमक्ष तिला शिवीगाळ केली होती. या वादानंतर परिस्थिती शांत झाली असे वाटत असतानाच २० फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने पीडितेला फोन केला. त्यावेळी “तुला कामावरून काढण्याचे आदेश आले आहेत” असे सांगत, ही कारवाई थांबवायची असेल तर तर तुला मला जे हवं ते द्यावं लागेल... " असे म्हणत आरोपीने शरीर सुखाची मागणी केली आणि याचा दबाव टाकल्याचा आरोप महिलेने केला आहे.



मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल


या घटनेनंतर पीडितेने मानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



पालिकेकडून तात्काळ कारवाई


घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी तातडीने कारवाई करत संबंधित लिपिकाला निलंबित करण्याचे आदेश दिले. तपासात कोणताही अडथळा येऊ नये, तसेच पुरावे आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.



महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


या घटनेमुळे सरकारी कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कार्यस्थळी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत

Comments
Add Comment

Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Wrestling : भारतीय मल्लांचे आशियाई कुस्तीत वर्चस्व, २७ पदकांसह पटकावले सांघिक विजेतेपद

नवी दिल्ली : व्हिएतनाममधील दा नांग येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय पुरुष

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Modi : मोदी सरकारने केलेल्या ३ सुधारणांमुळे ८० कोटी रेशनधारकांना होणार फायदा

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला ८० कोटी लोकांना अन्नधान्याचा