शिवसेनेच्या प्रचारात ‘नवी मुंबई, नवे सरकार’ची घोषणा

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रचाराची सुरुवात करताना ‘नवी मुंबई, नवे सरकार’ अशी ठळक घोषणा दिली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) प्रचाराच्या केंद्रस्थानी उमेदवार निवडीत मूळ भाजप इच्छुकांना डावलण्यात आल्याचा मुद्दा आणल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत भाजप–शिंदेसेनेची युती असली, तरी नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या भूमिकेमुळे युती न झाल्याचे चित्र आहे. जागावाटपाबाबत झालेल्या चर्चांनंतर नाईक यांच्यामार्फत दिलेला प्रस्ताव शिवसेनेला (शिंदे गट) मान्य न झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे.


भाजपने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पूर्ण अधिकार दिल्याने उमेदवार यादीत नाईक समर्थकांचा भरणा झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे नाराज झालेल्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) ‘नवी मुंबई, नवे सरकार’चा नारा देत ‘एकसंध लढूया’ असा संदेश दिला आहे. ही घोषणा संघ परिवाराला दिलेली साद असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले की, ''शिंदेसेनेने संघ परिवाराशी संबंधित उमेदवारांना संधी दिली असून भाजपच्या यादीत अशा उमेदवारांचा अभाव आहे.'' नवी मुंबईत ही लढाई शिवसेना–भाजप युतीची नसून ‘मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही’ अशी असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर शिंदेसेनेचा प्रचारही याच मुद्द्याभोवती केंद्रित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या