उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केली आहे. मतदार विशेष सखोल पडताळणीअंतर्गत झालेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, मतदार यादीत २५ लाखांपेक्षा अधिकांचे नाव एकापेक्षा अनेक ठिकाणी होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मतदारयादीत असणाऱ्या तब्बल १५ कोटी ४४ लाख मतदारांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही नावे मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. आता ६ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. २ कोटी १७ लाख मतदारांची नावे दुसऱ्या यादीत समाविष्ट झाली आहेत. तर, ४६ लाख २३ हजार मतदारांचा मृत्यू झाला आहे. २५ लाख ४७ हजार मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी होती. तर आता उत्तर प्रदेशात २ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार आहेत.


गाजियाबादमधून सर्वाधिक नावे कमी : गाजियाबादमधून सर्वाधिक नावे कमी करण्यात आली आहेत. नव्या ड्राफ्ट मतदार यादीनुसार, गाजियाबादमधून ८ लाख १६ हजार नावे कापण्यात आली आहेत. तसंच, सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून जवळपास ३ लाख मतदारांची नावे कमी झाली आहेत. काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीमधूनही २ लाख ६७ हजार नावे कमी झाली आहेत. यातील अनेकजण इतरत्र स्थायिक झाले आहेत, तर काहींचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण पत्त्यावर सापडले नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.


१५ हजार पोलिंग स्टेशन्स : निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाकडे ड्राफ्ट मतदार यादीची प्रत दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा यांनी म्हटलंय की एका पोलिंग स्टेशनवर १२०० हून अधिक वोटर नसतील. त्यामुळे नवीन पोलिंग स्टेशनही बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ६ दिवसांची मुदत घेण्यात आली होती. परिणामी १५ हजारांहून अधिक पोलिंग स्टेशन बनले आहेत. उत्तर प्रदेशात मतदार विशेष सखोल पडताळणी प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली होती. २६ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालली. या दरम्यान अनेकवेळा अंतिम मुदत वाढवण्यात आली. या काळात उत्तर प्रदेशातील तब्बल १५.४४ कोटी मतदारांची सखोल चौकशी करण्यात आली.

Comments
Add Comment

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच