Dharashiv News : पत्नी ने प्रियकराच्या मदतीने अपल्याच पतीला संपवल;दगडाने ठेचून हत्या..!

धाराशिव :उमरगा शहर बायपासजवळील कोरेगाववाडी येथील रस्त्यावर एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार धारदार हत्यार आणि दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आली. मृताचे नाव शाहूराज महादू सूर्यवंशी (वय ३५) असून, ही घटना रविवारी समोर आली. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध लावला. तपासात समोर आले की, या घटनेमागे अनैतिक संबंध होते.


रविवारी सकाळी नागरिकांना कोरेगाववाडी येथे रस्त्यावरच मृतदेह दिसला आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी उपविभागीय अधिकारी शेलार आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.दगडाने चेहरा ठेचल्यामुळे मृताचे चेहरा विद्रुप झाला होता.. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शेजारील शेतकरी आणि नागरिकांशी संपर्क साधला, आणि चार तासांच्या प्रयत्नानंतर मृताची ओळख पटवण्यात यश आले.हत्येच्या शोधासाठी श्वान पथक तैनात करण्यात आले, तर फॉरेन्सिक टीमसुद्धा घटनास्थळी उपस्थित होती. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डचा अभ्यास केल्यावर पोलिसांनी आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे आणि मृताची पत्नी गौरी शाहूराज सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले. यादरम्यान चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला.


पोलीसांनी सांगितले की, मृताची पत्नी गौरी आणि आरोपी शिवाजी यांच्यात अनैतिक संबंध होते. यामुळे शाहूराज आणि त्याची पत्नी सतत भांडत असत, आणि या संबंधात अडथळा असल्याने त्यांनी संगनमताने हत्या करण्याचा कट रचला. आरोपींनी रविवारी पहाटे दारू प्यायला दिली आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळील रस्त्यावर शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला पाडले. नंतर हंटर आणि दगडाने जबर मारहाण करून शाहुराज सुर्यवंशी याला संपवण्यात आलं

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या