माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू


माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी यांचा अपघात झाला. या अपघातात आठ वर्षांच्या आरुष गुगले याचा मृत्यू झाला.


साची गुगले, त्यांचे सासरे शांताराम गुगले आणि साची यांचा आठ वर्षांचा मुलगा आरुष हे स्कूटीवरून साई सायकल मार्ट माणगाव येथे जात होते. सायकलच्या टायरची दुरुस्ती करुन घेण्यासाठी ते जात होते. दुकानात जाण्यासाठी स्कूटी रस्त्याच्या कडेला लावून सर्व जण उतरले. स्कूटीवरुन उतरल्यावर आरुष वेगाने पुढे दुकानाच्या दिशेने जाऊ लागला. आरुष पुढे जात असताना माणगाव येथून मोर्बाच्या दिशेने वेगाने जात असलेल्या बसने आधी स्कूटीला ठोकरले पाठोपाठ आरुषला उडवले. आरुष गंभीर जखमी झाला. जखमांमुळे त्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला. साची यांनाही दुखापत झाली. वेगाने आलेली बस आणि रस्त्याच्या कडेला असलेली स्कूटी यांचेही नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. नरेंद्र बेलदार पुढील तपास करत आहेत.


Comments
Add Comment

Flipkart–Uber Partnership : राईड्सवर मिळणार सुपरकॉइन्स, रिवॉर्ड इकोसिस्टमचा विस्तार

मुंबई : भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देशातील आघाडीचा मोबिलिटी प्लॅटफॉर्म उबरसोबत धोरणात्मक

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४