माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू


माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी यांचा अपघात झाला. या अपघातात आठ वर्षांच्या आरुष गुगले याचा मृत्यू झाला.


साची गुगले, त्यांचे सासरे शांताराम गुगले आणि साची यांचा आठ वर्षांचा मुलगा आरुष हे स्कूटीवरून साई सायकल मार्ट माणगाव येथे जात होते. सायकलच्या टायरची दुरुस्ती करुन घेण्यासाठी ते जात होते. दुकानात जाण्यासाठी स्कूटी रस्त्याच्या कडेला लावून सर्व जण उतरले. स्कूटीवरुन उतरल्यावर आरुष वेगाने पुढे दुकानाच्या दिशेने जाऊ लागला. आरुष पुढे जात असताना माणगाव येथून मोर्बाच्या दिशेने वेगाने जात असलेल्या बसने आधी स्कूटीला ठोकरले पाठोपाठ आरुषला उडवले. आरुष गंभीर जखमी झाला. जखमांमुळे त्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला. साची यांनाही दुखापत झाली. वेगाने आलेली बस आणि रस्त्याच्या कडेला असलेली स्कूटी यांचेही नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. नरेंद्र बेलदार पुढील तपास करत आहेत.


Comments
Add Comment

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

केरळ स्टोरी २ चा टिझर यावेळी अधिक गडद; हिंदू मुलींवर निशाणा....

मुंबई : आजपर्यंत विपुल अमृतलाल शाह यांचे अनेक देशभक्तीपर सिनेमे किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालणारे सिनेमे आपण

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

डोंट बी शाय’सह प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्सच लँडमार्क कोलॅबोरेशन जाहीर

प्राइम व्हिडिओ × इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स: रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘डोंट बी शाय’मधून नव्या प्रवासाची

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा

उल्हासनगरमध्ये महापौरपदासाठी शिवसेना, उबाठा आणि टीओकेत रस्सीखेच

भाजपची रणनीती निर्णायक उल्हासनगर :उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी राजकारण आता केवळ संख्याबळावर