दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन!

मुंबई (प्रतिनिधी) : सीबीएसईने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक व सामाजिक समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी आता सीबीएसईने एक पाऊल उचलले आहे. या सेवेचा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू झाला असून तो १ जूनपर्यंत असणार आहे.


विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षांना मानसिक संतुलन चांगले ठेवून सामोरे जाता यावे, हा उद्देश आहे. ताणाचे व्यवस्थापन, प्रभावी अभ्यास पद्धती व भावनिक आरोग्य या संदर्भातील माहिती सीबीएसईच्या ‘www.cbse.gov.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे मानस-सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, विद्यार्थी व पालकांनी या सर्व सहाय्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीबीएसईने केले आहे.


टेली-कौन्सेलिंग सेवा उपलब्ध : विद्यार्थी आणि पालक ७३ प्रशिक्षित तज्ज्ञांच्या पॅनेलशी संवाद साधू शकतात. यात सीबीएसई संलग्न शाळांतील प्राचार्य, समुपदेशक, विशेष शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञांचा समावेश आहे. त्यातील ६१ समुपदेशक भारतातील असून, १२ समुपदेशक नेपाळ, जपान, कतार, ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये कार्यरत आहेत. ही सेवा स्वयंसेवी तत्त्वावर दिली जाते.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत