भटक्या कुत्र्यांवरील कारवाईविरोधात मुंबईत ‘करा किंवा मरा’ आंदोलन

मुंबई : भटक्या कुत्र्यांवरील कारवाईच्या विरोधात रविवारी, (४ जानेवारी) देशभरात पुकारण्यात आलेल्या ‘करा किंवा मरा’ आंदोलनात मुंबईतील प्राणीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अंधेरी परिसरात सुमारे दोन किलोमीटर लांबीची रॅली काढण्यात आली असून, हजारो प्राणीप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते या निषेधात सहभागी झाले होते. यावेळी “प्राण्यांवर क्रूरता थांबवा”, “मानवी आणि प्राणी सहअस्तित्व हवे” अशा घोषणा देण्यात आल्या.


आंदोलनकर्त्यांनी येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. सरकार आणि प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तसेच प्राणी आणि प्राणीप्रेमींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरूच राहिल्या, तर स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


या आंदोलनात सहभागी झालेले प्राणी हक्क सल्लागार रोशन पाठक यांनी सांगितले की, देशभरातील प्राणीप्रेमींनी लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “जोपर्यंत प्राण्यांसाठी योग्य कायदे, मानवी धोरणे आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असे ते म्हणाले.या आंदोलनामागील वादाचे मूळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाशी संबंधित आहे. न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना उचलून नियुक्त आश्रयस्थानांमध्ये नेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, प्राणीप्रेमी या निर्णयाला विरोध करत असून, नसबंदी व लसीकरणाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवले असते तर मानव आणि प्राणी शांततेत एकत्र राहू शकले असते, असे त्यांचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनंतरही स्थानिक प्रशासनाने प्राण्यांसाठी अधिकृत फीडिंग स्पॉट्स उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे प्राणी खाऊ घालणाऱ्या नागरिकांना सतत त्रास व धमक्या दिल्या जात आहेत. कायद्याने परवानगी असूनही, फीडर्स व रेस्क्यू करणाऱ्यांना बेकायदेशीरपणे अडवले जाते व अपमानास्पद वागणूक दिली जाते, असे पाठक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी