Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सला मेहेकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत.



नेमकं काय घडलं?


नागपूरवरून मुंबईच्या दिशेने ही खाजगी बस सुसाट वेगाने धावत असताना, शिवणी पिसा गावाजवळ चालकाला बसमधून धूर येत असल्याचे जाणवले. त्याने वेळ न घालवता तात्काळ बस महामार्गाच्या कडेला उभी केली आणि आरडाओरड करून प्रवाशांना सावध केले. झोपेत असलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने संपूर्ण बसला वेढले. काही मिनिटांतच बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.





प्रवासी सुरक्षित, पण जखमींवर उपचार सुरू


या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले असले तरी, घाईघाईत बसमधून उतरताना काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे किंवा इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


काही महिन्यांपूर्वी याच समृद्धी महामार्गावर बसला आग लागून २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतरही खाजगी बसेसची तपासणी आणि महामार्गावरील अग्निशमन सुविधांबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. या आगीच्या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर