२० दिवसांच्या एसटी भाड्यात महिनाभर प्रवास !

मुंबई : दररोज लालपरीने किंवा ई-बसने प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवी ई बसपास योजना सुरू केली आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडणारी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देणारी 'नवीन मासिक आणि त्रैमासिक पास योजना' जाहीर करण्यात आली आहे. "२० दिवसांचे भाडे भरा आणि ३० दिवस बिनधास्त प्रवास करा," असे या योजनेचे मुख्य आकर्षण आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांनी आरामदायी ई-बसकडे वळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ९० दिवसांच्या प्रवासासाठी ६० दिवसांचे भाडे आकारले जाईल. येथे तब्बल एका महिन्याचे भाडे वाचणार आहे. ही सवलत महामंडळाच्या ताफ्यातील ९ मीटर आणि १२ मीटर ई-बसेस तसेच 'ई-शिवाई' बस सेवेसाठी लागू असेल. सध्या एसटीच्या ताफ्यात साधारणपणे ५०० हून अधिक ई-बसेस धावत असून, आगामी काळात ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा