'एक कोटी लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ करणार'

मुंबई : “राज्यात आतापर्यंत ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात एकट्या मेघना बोर्डीकर यांनी १ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यावर्षी १ कोटी लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी परभणी येथील प्रचारसभेत दिली.


विधानसभेच्या निवडणुका झाल्या, की ‘लखपती दीदी’ योजना बंद केली जाईल, असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र, बहुमत मिळाल्यानंतरही भाजपने ही योजना बंद केली नाही. जोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर आहे, तोपर्यंत ‘लखपती दीदी’ किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले.


त्याचप्रमाणे परभणीच्या विकासाच्या जो आड येईल, त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. ते म्हणाले, खऱ्या अर्थाने प्रभावतीच्या या नगरीत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, की किती वर्षे आपण इतिहासात सांगणार आहोत? आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे. इतिहासात जगणारे, इतिहासातच मरून जातात. इतिहास लक्षात ठेवायचा असतो, इतिहासाचा सन्मान करायचा असतो, पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो. त्यामुळे येत्या १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, त्यानंतर पाच वर्षांसाठी ‘देवाभाऊ’ तुमची काळजी घेईल”, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

Schools Open : राज्यातील सर्व शाळा गुरुवारी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या