'एक कोटी लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ करणार'

मुंबई : “राज्यात आतापर्यंत ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात एकट्या मेघना बोर्डीकर यांनी १ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यावर्षी १ कोटी लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी परभणी येथील प्रचारसभेत दिली.


विधानसभेच्या निवडणुका झाल्या, की ‘लखपती दीदी’ योजना बंद केली जाईल, असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र, बहुमत मिळाल्यानंतरही भाजपने ही योजना बंद केली नाही. जोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर आहे, तोपर्यंत ‘लखपती दीदी’ किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले.


त्याचप्रमाणे परभणीच्या विकासाच्या जो आड येईल, त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. ते म्हणाले, खऱ्या अर्थाने प्रभावतीच्या या नगरीत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, की किती वर्षे आपण इतिहासात सांगणार आहोत? आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे. इतिहासात जगणारे, इतिहासातच मरून जातात. इतिहास लक्षात ठेवायचा असतो, इतिहासाचा सन्मान करायचा असतो, पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो. त्यामुळे येत्या १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, त्यानंतर पाच वर्षांसाठी ‘देवाभाऊ’ तुमची काळजी घेईल”, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये

मुंबईत २२ वर्षांत कुठे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग

इमारतींना ओसी, पण प्रत्यक्षात सत्ताकाळात उबाठाला अंमलबजावणी करण्यात अपयश उबाठ- मनसेचा वचननामा, आमचा

दोन माजी बेस्ट समिती अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवलेले दोन माजी नगरसेवक यंदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन!

मुंबई (प्रतिनिधी) : सीबीएसईने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक व सामाजिक समुपदेशन सेवा सुरू