अर्ज माघारी, बिनविरोध निवडीचे नाट्य संपले

ठाण्यात ६४९ उमेदवार रिंगणात, ७ बिनविरोध


ठाणे : अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, ऐनवेळी मिळालेले एबी फॉर्म, उमेदवारी अर्जांचा पाऊस, अर्ज बाद होण्यापासून ते माघारीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिका निवडणुकांचा खरा प्रचार रणसंग्राम सुरू होणार आहे. उद्या रविवार असल्याने आणि त्यानंतर अवघे दहा दिवस प्रचारासाठी हाती असल्याने प्रचाराला वेग येण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नऊ प्रभाग समित्यांमधून दाखल झालेल्या एकूण १ हजार १०७ नामनिर्देशन अर्जांपैकी छाननी आणि माघारीनंतर अखेर ६४९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. गेल्या दोन दिवसांत तब्बल २६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.


दरम्यान, सात ठिकाणी कोणताही प्रतिस्पर्धी नसल्याने शिवसेना (शिंदे गट) चे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता ठाण्यातील ३३ प्रभागांमधील १३१ जागांपैकी १२४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत दाखल झालेल्या १ हजार १०७ अर्जांपैकी ९१८ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याचे चित्र होते.


१ आणि २ जानेवारी या कालावधीत काही प्रभागांत लढत बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या. मात्र अखेरीस मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्यानेच काही ठिकाणी समीकरणे बदलली.


माघारीनंतर माजिवडा-मानपाडा, लोकमान्य सावरकरनगर आणि कळवा या प्रभाग समित्यांमध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात असून, काही प्रभागांमध्ये तुलनेने कमी उमेदवारांमध्येच लढत होत असल्याचे चित्र आहे. बिनविरोध निवडीचे नाट्य संपल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उमेदवारांची खरी कसोटी लागणार असून, येत्या दहा दिवसांत ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.


प्रभाग समितीनिहाय उमेदवारांची संख्या :


माजिवडा–मानपाडा : ९२


वर्तकनगर : ६५


लोकमान्य सावरकरनगर : ८३


वागळे : ३६


नौपाडा–कोपरी : ५२


उथळसर : ५०


कळवा : ८२


मुंब्रा (प्रभाग २६–३१) : ३९


मुंब्रा (प्रभाग ३०–३२) : ५७


दिवा (प्रभाग २७–२८) : ४२


दिवा (प्रभाग २९–३३) : ५१

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना