मुंबई वगळता इतर ठिकाणी रिपाइंचा महायुतीला पाठिंबा

मुंबई : भाजपने मुंबईत कोणत्याही जागा न सोडल्याने रिपाइंने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, भाजपशी मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगत अन्य सर्वत्र महायुतीला रिपाइंचा पाठिंबा असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घोषित केले. महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जेथे महायुतीचे एकत्रित उमेदवार आहेत तेथे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलेे. भाजप व शिंदे सेनेचे उमेदवार समोरासमोर उभ्या असलेल्या वाॅर्डांमधील रिपाइंची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. महायुतीत मुंबईत एकत्र जागावाटप झाले तरी रिपाइंला जागा मिळाल्या नाहीत. याबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. ती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या स्वतंत्र बैठकाही घेतल्या. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट होते आहे. मुंबईत दलित-मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-वंचित एकत्रपणे निवडणुकांना सामोरे जात आहेत, तर ठाकरे बंधूंनाही विशेषतः उबाठाना दलित मते मिळतील असे वाटते आहे. या तिहेरी लढतीत भाजपला रिपब्लिकन पक्षासाठी स्वतंत्रपणे जागा देणे उचित वाटले नसावे. तथापि, जागावाटप योग्यप्रकारे झाले नसले तरी आमची युती अभंग आहे. युतीत जिंकून येईल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर