‘ठाकरेंचा वचननामा नव्हे, अपचननामा!’

मुंबई : पालिका निवडणुकीच्या अानुषंगाने उबाठा-मनसेने संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. त्यात ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आलेे. भाजपचे मंत्री आशीष शेलार यांनी त्यावर आक्षेप घेतला असून, मुंबईतील घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा मुद्दा भाजपचा आहे. हा मुद्दा आता उबाठा आणि मनसेने चोरल्याचा आरोप करत, या वचननाम्याला त्यांनी ‘अपचननामा’ असे नाव दिले. शेलार म्हणाले, भाजपच्या नगरसेवकांनी ५०० ऐवजी ७०० चौरस फुटांपर्यंतची माफी देण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, तेव्हा पालिकेत सत्तेत असलेल्या उबाठाने फक्त ५०० चौरस फुटांचाच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. ७ मार्च २०१८ रोजी आम्ही ७०० ते ७५० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा प्रस्ताव पालिकेकडून घेण्याची मागणी केली होती. उबाठाने मात्र ७०० ते ७५० चौरस फुटांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यासच विरोध केला, ' असा आरोप आशीष शेलार यांनी केला. आता निवडणुकीच्या तोंडावर उबाठा आश्वासनांचा दिखावा करीत मुंबईकरांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या जुन्या मागण्या चोरून वचननामा काढलात, तर तो वचननामा नव्हे, तर चोरलेल्या मागणीचा ‘अपचननामा’ होईल, असा टोला आशीष शेलार यांनी लगावला.


Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी